Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Supreme Court : सत्तासंघर्षाच्या युक्तीवादात 'या' दोन गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या; निकालावरही त्याचा प्रभाव पडणार?

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी मागील आठवड्यात संपली. मात्र, आता निकालाची उत्सुक्ता आहे. मागील नऊ महिने या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चाचली. यामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वतीने अनेक मोठे वकील युक्तीवाद करत होते. हे युक्तीवाद संपल्यानंतर निकालासंदर्भात अनेक घटनातज्ज्ञांनी निकालाबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या आहेत.

या संपूर्ण सुनावणीमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या वतीने एक मुद्दा लावून धरण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या वतीनेही एक मुद्दा लावून धरण्यात आला. या दोन्ही मुद्यांवरुन घटनापीठानेही अनेक प्रश्न विचारले. त्यामुळे निकालामध्ये या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरु शकतात, असे घटनातज्ज्ञांचे मत आहे.

ठाकरे गटाच्या वतीने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. ते चुकीचे होते, राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. राज्यपालांच्या निर्णयामुळेच ठाकरे सरकार पडले, असा युक्तीवाद त्यांनी केला. त्यानंतर राज्यपालांची बाजू मांडणारे, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना घटनापीठाने अनेक पश्न विचारले. या सुनावणीमध्ये सर्वाधिक प्रश्न घटनापीठाच्या वतीने राज्यपालांच्या भूमिकेवर विचारले गेले.

दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा हा मुद्दा लावून धरण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकार आम्ही पाडले नाही, त्यांनी स्वता: राजीनामा दिला. या मुद्याभोवती शिंदे गटाचा युक्तीवाद फिरत होता. घटनापीठानेही या मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

या व्यतीरिक्त अनेक मुद्दे या युक्तीवादात आले. मात्र, या दोन मुद्यांवर जास्त भर दिला गेला. त्यामुळे अनेक घटनातज्ज्ञांनी या दोन युक्तीवादांना गृहित धरुन अनेक शक्यता व्यक्त केल्या आहेत. मात्र, दोन्ही गटांनी उपस्थित केलेले हे मुद्दे न्यायालयाने किती महत्त्वाचे ठरवले हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, न्यायालयाच्या निर्णयात या दोन्ही गोष्टींचा प्रभाव असले, अशी शक्याता अनेकांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT