प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षात यावं अन् नेतृत्व करावं... आठवलेंचे आवाहन
लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांनी एकत्रितपणे राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. पण, अनेक पक्ष आणि संघटना स्थापन होत आहेत. यामुळे यश कमी मिळते. यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून रिपब्लिकन पक्षात यावं आणि नेतृत्व करावं, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. (Ramdas Athavale Latest Marathi News)
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फूट उंचीच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त लातुर येथे आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आठवले म्हणाले, ''दलित समाज सत्तेपासून दूर आहे, एकसंघ शक्ती निर्माण झाल्यास विकास शक्य आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि रिपब्लिकन पक्षात येऊन नेतृत्व करावं. जनतेचे भलं होणार असेल तर मी चार पावलं मागे यायला तयार आहे.''
''रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला पक्ष खर तर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्ष चालवायला हवा. या रिपब्लिकन पक्षात अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित आहेत.'' यावेळी लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.