औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तानं उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. अंबड घनसावंगी या मतदारसंघातून यावेळेस शिवसेनेच्या डॉ. हिकमत उडाण यांचा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते निराश झालेले आहेत.
गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा आमदार निवडून येईल म्हणून प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावर्षी निसटता पराभव पहावा लागला. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी पत्र लिहित उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.
पराभूत उमेदवार हिकमत उढाण यांना विधान परिषदेची आमदारकी द्यावी आणि न्याय करावा. आधी आमचे वडील त्यानंतर आम्ही तेच स्वप्न पाहत होतो. स्वप्न काही पूर्ण होत नाही, त्यामुळे आता हिकमत उढाण यांना आमदार करावा ही आमची मागणी असल्याचं रक्तरंजित पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि 2024 ला आव्हान म्हणुन उभे रहायचे असेल तर येणाऱ्या मंत्री मंडळात घनसावंगीचा विचार व्हावा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे .
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.