अखिलेश यादवांचा तडकाफडकी राजीनामा अन् म्हणाले, हा त्याग आवश्यकच!

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Akhilesh Yadav News, Akhilesh Yadav Resigns From Lok Sabha News
Akhilesh Yadav News, Akhilesh Yadav Resigns From Lok Sabha Newssarkarnama

दिल्ली : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सत्ता मिळवली असली तरी समाजवादी पक्षानेही आपल्या जागा वाढवत प्रमुख विरोधी पक्षाची जागा घेतली आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवला. याचवेळी समाजवादी पक्षाच्या आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. आता अखिलेश यादव यांनी आमदारकीसाठी खासदारकीवर पाणी सोडले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कोट्यवधी जनतेने आम्हाला मते दिली आहे. विधानसभा निवडणुकीत आमचा नैतिक विजय झाला आहे. याचा मान राखण्यासाठी मी करहल विधानसभा मतदारसंघातील आमदारकी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी आझमगडच्या विकासासाठीही मी कटिबद्ध आहे. महागाई, बेरोजगार आणि सामाजिक असमानता या विरोधात लढण्यासाठी हा त्याग आवश्यक आहे.

Akhilesh Yadav News, Akhilesh Yadav Resigns From Lok Sabha News
धामी ठरले 'बाजीगर'! मोदी-शहांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा मान

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षातील (Samajwadi Party) घडामोडी वाढल्या आहेत. अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सपाचे विधिमंडळात अखिलेश हेच नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला राज्यात टक्कर देण्यासाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. आता खासदारकी सोडून राज्यात योगींना टक्कर देण्यासाठी त्यांनी राज्यातच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

Akhilesh Yadav News, Akhilesh Yadav Resigns From Lok Sabha News
विरोधकांना आणखी एक धक्का! विधानसभा अध्यक्षांकडून पाच आमदारांचे निलंबन

अखिलेश यांच्या पाठोपाठ आझम खान यांनी खासदारकीवर पाणी सोडत विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत आझम खान हे रामपूर मतदारसंघातून सुमारे ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. सध्या ते रामपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. निवडणुकीआधी आझम खान यांच्यावर जल निगम भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com