अमरिंदरसिंग यांचं ठरलं! भाजपसोबत जाणार पण एका अटीवर...

पंजाबच्या भविष्याची लढाई आता सुरू झाल्याचे अमरिंदरसिंग यांनी म्हटलं आहे.
Amit Shah, AmarinderSingh
Amit Shah, AmarinderSingh

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर तीन दिवसांत त्यांनी थेट गांधी कुटुंबावरच हल्लाबोल केला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनाही त्यांनी थेट इशारा दिला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र चूल मांडण्याची तयारी त्यांनी केली असून भाजपसोबत जाण्याचे संकेतही दिले आहेत.

अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रविन ठुकराल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. अमरिंदरसिंग यांनी अजून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. पण त्यांनी यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी ठुकराल यांनी ट्विट करत त्याबाबत स्पष्ट संकेत दिले. 'पंजाबच्या भविष्याची लढाई आता सुरू झाली आहे. पंजाबमधील लोकांच्या सेवेसाठी तसेच मागील वर्षभरापासून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या राजकीय पक्षाची घोषणा लवकरच केली जाईल,' असं या घोषणा या ट्विटमध्ये करण्यात आलेली आहे.

Amit Shah, AmarinderSingh
गृहखातं कसं असतं?, असं जयंत पाटलांनी विचारलं अन् आबांनी अशी टाकली गुगली...

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत तोडगा निघाल्यास भाजपसोबत जागावाटप केले जाईल, असं अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच समविचारी पक्षांशीही आघाडी केली जाईल. त्यामध्ये अकाली दलातून फुटलेले काही गट प्रामुख्याने धिंडसा आणि ब्रम्हपुरा आदी गटांची नावे घेत त्यांनी काँग्रेस व अकाली दलाविरोधात दंड थोपडले आहेत.

अमरिंदरसिंग यांनी 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तीन दिवसांतच त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली.

मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर अमिरिंदरसिंग यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये गांधी कुटूंबावरही निशाणा साधला होता. सिध्दू यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी कोणतंही बलिदान देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सिध्दू यांच्याविरोधात उमेदवार उभा करू, असं त्यांनी म्हटलं आहे. सिध्दू यांच्यासारख्या खतरनाक व्यक्तीपासून देशाला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू. सिध्दू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला निवडणुकीत दहा जागाही मिळणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com