Arvind Kejriwal: मतदानापूर्वीच केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल; यमुनेच्या पाण्यात विष?

केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आणि दोन राज्यातील लोकांमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. अॅड. जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली विधानसभा मतदानाला सुरवात होण्यापूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला (मंगळवारी) केजरीवाल यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

कुरुक्षेत्र च्या शाहाबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. हरियाणा सरकारवर त्यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी, आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर ही कारवाई केल्याने आप आमदी पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहाबाद पोलिस ठाण्याचे अधिकारी सतीश कुमार यांनी सांगितले.

Arvind Kejriwal
Sonia Gandhi: राष्ट्रपतींना 'बिचारी महिला' म्हणणाऱ्या सोनिया गांधी अडचणीत? पप्पू यादव यांनाही विशेषाधिकार भंगाची नोटीस

केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आणि दोन राज्यातील लोकांमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. अॅड. जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या इतर सदस्यांविरुद्ध हरियाणामध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

"कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धेचे प्रतीक यमुना नदी आहे. केजरीवाल यांच्या विधानाने जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने केलेल्या अशा निराधार आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे आंतरराज्य सौहार्द कमकुवत होतेच पण सरकारी संस्थांवरील जनतेचा विश्वासही कमी होतो," असे जगमोहन मनचंदा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Arvind Kejriwal
Delhi Election 2025: निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री अडचणीत; निवडणूक आयोगाचा दणका

काय म्हणाले होते केजरीवाल?

  • दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे

  • दिल्लीतील लोक मरावेत आणि दोष 'आप'वर यावा यासाठी दिल्लीत अराजकता निर्माण करण्यासाठी हे केले गेले आहे.

  • हरियाणा सरकारने दिल्लीचे पाणी विषारी बनवले आहे. दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले.

  • भाजप सरकारने पाण्यात इतके विष मिसळले आहे की ते जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com