पंतप्रधान मोदींचे 'बालिका वधू'ने मानले आभार!

कलर्स टिव्हीने दोन्ही आनंदी लहान, मोठी यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या दोघी हात जोडून मोदींचे आभार मानतात दिसत आहेत. त्या फोटोखाली लिहिलं आहे की, नव्या दिशेनं पाऊल उचलण्यासाठी आनंदीकडून सरकारला धन्यवाद.
Narendra Modi

Narendra Modi

sarkarnama

नवी दिल्ली : मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुलगी 21 वर्षाची झाल्याशिवाय कोणत्याही पालकांना तिचं लग्न लावून देता येणार नाही.

देशात बालविवाहाचा प्रश्न संपविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, सरकारी पातळीवर प्रयत्न करीत आहेत. पण तरीही देशाच्या काही भागात आजही बालविवाह होताना दिसत आहेत. बालविवाहाच्या प्रश्नावर सध्या सुरु असलेल्या बालिका वधू-२ मधील 'आनंदी'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करुन त्यांचे आभार मानले आहे.

कलर्स टिव्हीवर सुरु असलेल्या 'बालिका वधु' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) (आनंदी) हिने सोशल मीडीयावर याबाबत पोस्ट शेअर करुन मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. तिनं मोदींचे आभार मानले आहे. कलर्स टिव्हीने दोन्ही आनंदी लहान, मोठी यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या दोघी हात जोडून मोदींचे आभार मानतात दिसत आहेत. त्या फोटोखाली लिहिलं आहे की, नव्या दिशेनं पाऊल उचलण्यासाठी आनंदीकडून सरकारला धन्यवाद.

15 ऑगस्ट 2020 रोजी लालकिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा उल्लेख केला होता. मुलींचा कुपोषणापासून बचाव करण्यासाठी त्यांचा विवाह योग्यवेळी होण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले होते.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi</p></div>
नितेश राणेंना अटक करा ; अन्यथा आंदोलन, शिवसेनेचा इशारा

विद्यमान कायद्यानुसार मुलीच्या लग्नाची वय 18 वर्ष ठरवण्यात आलं आहे. आता हे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला आहे. आता बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्पेशल मॅरेज अॅक्ट कायदा आणि हिंदू मॅरेज अॅक्ट कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.

नीती आयोगामध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आलेल्या टास्क फोर्सने मुलीच्या लग्नाचं वय वाढवण्याची शिफारस केली होती. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉलही या टास्क फोर्सचे सदस्य होते. त्याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता मिशन, तसेच न्याय व विधी मंत्रालयाच्या विधेयक विभागाचे सचिव या टास्क फोर्सचे सदस्य होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com