राजकारण तापलं! भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांसह राजभवन गाठलं

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सगळे आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांसह राजभवन गाठले.
BJP leaders meet Governor
BJP leaders meet Governor Sarkarnama

रांची : राज्य सरकार आणि भाजप (BJP) असा वाद पेटला आहे. या वादात आता भाजपने राज्यपालांना ओढले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सगळे आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांसह राजभवन गाठून सरकारच्या विरोधात तक्रार केली. मागील दोन वर्षांपासून विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापले आहे.

झारखंडमधील (Jharkhand) झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) आघाडीच्या सरकारने भाजपची कोंडी केली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात यावरून गदारोळ सुरू आहे. माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी भाजपने विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपच्या थिंक टँकच्या बैठकीत याच विषयावर जोरदार चर्चा झाली. विधानसभा अधिवेशनात या मुद्द्यावर आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. विरोधी पक्षनेतेपद रिक्त असतानाही विधानसभेचे कामकाज सुरू असल्याबद्दल भाजपमध्ये संतप्त भावना आहेत.

BJP leaders meet Governor
भाजपची कोंडी! विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व आमदारांसह अदिवासी विभागाचे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि लोकसभा व राज्यसभेतील खासदार राजभवनावर धडकले. त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. बाबूलाल मरांडी यांना विरोधी पक्षनेता बनवावे, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. सरकार स्थापन होऊन 26 महिने झाले तरी अद्याप विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाही, हा मुद्दा भाजपने उपस्थित केला. भाजपने एकमताने मरांडी यांचे नाव दिले असतानाही विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेत नसल्याची तक्रार भाजप नेत्यांनी केली. यावर आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

BJP leaders meet Governor
महागाईच्या झळा! विधानसभा निवणुका संपताच एलपीजी सिंलिंडर हजार रुपयांवर जाणार?

बाबूलाल मरांडी हे आधी जेव्हीएम-पी या पक्षाच्या तिकिटावर गिरीडिह मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आले. नंतर त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलिन केला. त्यांना भाजपचे आमदार म्हणून अद्याप विधानसभा अध्यक्ष रविंद्रनाथ महातो यांनी मान्यता दिलेली नाही. याला दोन वर्षे उलटूनही अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविना विधानसभा सुरू आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत अधिवेशनाबाबत रणनीती ठरवण्यात आली. भाजपने आता सरकारच्या विरोधात मोहीम उघडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com