

Congress News : केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस नंबर एकचा पक्ष राहिला. सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. आता तेलंगणामध्ये तीन टप्प्यात झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत काँग्रेस मोठे यश मिळवत सर्वाधिक जागा मिळवल्या आहे.
तेलंगणामध्ये तीन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. या निवडणुकीत 12 हजार 719 जागांपैकी काँग्रेसने सात हजार 93 जागांवर विजय मिळवला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर बीआरएस आहे. या पक्षा पक्षाला तीन हजार 488 जागा मिळाल्या आहेत.
भाजपला अवघ्या 699 जागा मिळाल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर. अपक्षांना एक हजार 439 जागा मिळाल्या आहेत. त्यातील 80 टक्के बंडखोर हे काँग्रेसचेच आहेत. ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे मताधिक्क 64 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
या पूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव झाला होता. मात्र, यंदा त्यांची कामगिरी सुधारली आहे. पक्षाने ग्रामीण भागात आपली ताकद कायम ठेवली असून त्यांना 27.4 जागा मिळवल्या आहेत.
भाजपने 699 जागा मिळवल्या असल्या तरी त्यांची कामगिरी अपेक्षा पेक्षा चांगली होऊ शकली नाही. पक्षाला एकुण जागांच्या केवळ 5.5 टक्के जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी जेथे भाजपचे सदस्य होते तेथेच पक्षाला यश मिळाल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.