मंत्र्यांचा मुलगा मोकाट पण प्रियांका गांधींवरच गुन्हा दाखल अन् अटकही!

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी होत आहे.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याआधीच घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आल्याचंही वृत्त आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या घटनेत सहभाग असल्याचा दावा शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. त्याला अटक करण्याची मागणी संघटनांसह प्रियांका गांधी यांनीही केली आहे. प्रियांका गांधी यांना रविवारी पहाटे उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. कोणताही आदेश नसताना तसेच गुन्हा दाखल नसताना 28 तासांहून अधिक काळ आपल्याला कैदेत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Priyanka Gandhi
धक्कादायक : प्रियांका गांधी कैदेत असलेल्या खोलीवर ड्रोनच्या घिरट्या

त्यानंतर आता सीतापूर जिल्ह्यातील हरगाव पोलिसांनी प्रियांका गांधी यांच्यासह दिपेंद्र हूडा, अजय कुमार लालू व इतर आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नजरकैदेत असलेल्या प्रियांका यांना अटक केल्याचंही वृत्त आहे. त्यांना स्थानिक न्यायालयात नेलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी प्रियांका गांधी यांना पहाटे साडे चार वाजता अटक केल्याचा दावा करण्यात आला आहे. सुर्योदयापूर्वी महिला पोलिस नसताना पुरूष पोलिसांनी प्रियांका गांधी यांना अटक केली आहे. अद्याप त्यांना न्यायालयात नेण्यात आलेलं नाही. हे बेकायदेशीर आहे. कायद्यातील अनेक तरतुदींचा भंग करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचा अर्थ वेगळा आहे. कायदा म्हणजे आदित्यनाथ यांचा कायदा आणि त्यांचे आदेश. प्रियांका गांधी यांच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करण्यात आले आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.

घटनेनंतर काही तासांतच प्रियांका गांधी लखीमपूर खीरीच्या दिशेने निघाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवून ताब्यात घेतले. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये कैदेत ठेवण्यात आलं आहे. जवळपास 30 तासांहून अधिक काळ त्या तिथे आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना अद्याप शेतकऱ्यांना चिरडणारा व्यक्ती अटक का नाही, असा सवाल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com