Rahul Gandhi : तुम्ही माझे घर, कुटुंब! खासदारकीच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचे ‘इमोशनल’ पत्र

Waynad Raebareli Constituency Congress Lok Sabha Election : राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते रायबरेलीतूनही निवडून आले आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी मतदारसंघातील नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तुम्ही माझे घर, कुटुंब असल्याची भावनिक साद त्यांनी घातली आहे.

राहुल गांधी हे वायनाडसह रायबरेली मतदारसंघातूनही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पण नियमानुसार त्यांना एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता येणार असल्याने त्यांनी वायनाड मतदारसंघ सोडत राजीनामा दिला. या मतदारसंघातून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर राहुल यांनी रविवारी वायनाडकरांसाठी भावनिक पत्र लिहिलं आहे.

Rahul Gandhi
Lok Sabha Session : लोकसभेत शपथ घ्यायला आसामच्या खासदारांचा पहिला नंबर, शेवटी बंगाल! पहिल्याच दिवशी होणार वाद?

काय म्हटलंय राहुल गांधींनी?

मी पाच वर्षांपुर्वी तुम्हाला भेटलो. मी पहिल्यांदा तुम्हाला मदतीसाठी भेटलो होतो. मी इथला नसतानाही माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझ्यावर दररोज टीका होत असताना तुमच्या प्रेमाने माझे रक्षण केले. तुम्ही माझे घर, कुटुंब आहात, अशी भावनिक साद राहुल यांनी घातली आहे.

पूरस्थितीच्या काळात मी जे पाहिले, ते विसरू शकत नाही. अनेक कुटुंबांनी सर्वकाही गमावलं. अनेकांचे जीव, संपत्ती, मित्र, सगळं गेलं. पण त्यानंतरही तुमच्यापैकी एकानेही, एवढेच नाही तर लहान मुलांनीही आत्मसन्मान गमावला नाही. वायनाडमधील प्रत्येकाने दिलेले प्रेम माझ्या सदैव आठवणीत राहील, असे राहुल यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi
Uttar Pradesh MLA : राज्यसभेसाठी साथ देणारे ‘ते’ 7 आमदार भाजपला नकोसे! आता पदही जाणार?   

हजारो लोकासंमोर माझ्या शब्दांचे भाषांतर करणाऱ्या मुलींचा आत्मविश्वास आणि धैर्य विसरू शकत नाही. संसदेत तुमचा आवाज बनण्याचा सन्मान मला मिळाला. हे खूप आनंददायी होते. मी दु:खी आहे, पण समाधानीही. कारण माझी बहीण प्रियांका आता तुमचे प्रतिनिधित्व करेल. तुम्ही तिला संधी दिली तर ती उत्कृष्ट काम करेल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला आहे.

रायबरेलीतही माझे प्रेमळ कुटुंब असल्याने मी समाधानी आहे. रायबरेली आणि वायनाड येथील लोकांसाठी मी कटिबध्द आहे. देशात पसरलेल्या हिंसा आणि द्वेषाला आपण एकत्रितपणे सामारे जाऊ. माझ्या तुम्ही जे काही केले, त्याबद्दल आभार कसे मानू, हे कळत नाही. तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुम्ही नेहमीच तुमच्या सेवेसाठी तिथे असेन, असे म्हणत राहुल यांनी पत्राचा शेवट केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com