Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, शेतकरी आक्रमक; अंबालामध्ये इंटरनेट बंद

Farmers Protest Shambhu Border : शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी, हरियाणा सरकारने अंबालामधील 12 गावांमध्ये मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा बंद केली आहे.
Farmers Protest Shambhu Border
Farmers Protest Shambhu BorderSarkarnama
Published on
Updated on

Farmers Protest Shambhu Border : पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाच्या 307 व्या दिवशी शेतकरी केंद्र सरकारशी चर्चा करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश गृहविभागाने दिले आहेत. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा 'दिल्ली चलोचा' नारा दिला आहे. पण याआधीच हरियाणा पोलिसांनी दोन वेळा शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले आहे. पण शेतकरी दिल्ली जाण्यावर ठाम आहेत.

शेतकरी करणार पुन्हा दिल्लीकडे कूच

किसान मजदूर मोर्चा (KMM) नेते सर्वन सिंह पंधेर यांनी सरकारच्या या समस्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर मौन बाळगल्याचा आरोप केला आहे. सरकारी यंत्रणा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

किसान मजदूर मोर्चा (KMM) नेते सर्वन सिंग पंढेर यांनी जाहीर केले आहे की 101 शेतकऱ्यांचा एक नवीन तुकडा शनिवारी (14 डिसेंबर 2024) दुपारी हरियाणातील शंभू सीमेवरून दिल्लीकडे कूच करतील. आज तिसऱ्यांदा शेतकरी दिल्लीकडे जाणार असून त्याआधी हरियाणा पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरूवात केली आहे. 

Farmers Protest Shambhu Border
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेसला झटका; गोव्यातील आमदार अपात्रता याचिका फेटाळली

अंबालामध्ये इंटरनेट बंद

हरियाणा सरकारने शनिवारी शांतता राखण्यासाठी अंबाला जिल्ह्यातील 12 गावांमध्ये मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा देखील बंद केली. ही स्थगिती 17 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

प्रशासनाने सांगितले की, "डांगडेहरी, लेहगढ, मानकपूर, दादियाना, बडी घेल, छोटी घेल, ल्हारसा, कालू माजरा, देवी नगर (हिरा नगर, नरेश विहार), सदोपूर, सुलतानपूर आणि अंबाला येथील काकरू गावात शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था." कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राकेश टिकैत यांनी डल्लेवाल यांची घेतली भेट

संयुक्त किसान मोर्चा (SKM) नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी पंजाबचे शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची भेट घेतली. त्यांनी शेतकरी गटांना ‘संयुक्त लढ्या’साठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

Farmers Protest Shambhu Border
Manoj Parmar Suicide : 'भाजपमध्ये असता तर ही वेळ आली नसती', 'ईडी'मुळे पती-पत्नीची आत्महत्या; राहुल गांधींना भेट देणं भोवलं?

टिकैत म्हणाले की, केंद्राला शेतकऱ्यांची ताकद दाखवावी लागेल आणि त्यासाठी दिल्लीला पूर्वीच्या आंदोलनाप्रमाणे सीमेवर नव्हे तर केएमपी (कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्ग) द्वारे वेढा घातला जाईल, असे ते म्हणाले. जेव्हा दिल्ली वेढली जाईल तेव्हा ते केएमपीकडून होईल, ते केव्हा आणि कसे होते ते आम्ही पाहू." एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, केंद्राचे धोरण शेतकरी संघटनांमध्ये त्यांच्या अजेंड्यानुसार फूट पाडण्याचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com