केंद्रीय मंत्र्याच्या मुलानंतर आणखी एका भाजप नेत्यासह चार जणांना बेड्या

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला यापूर्वीच अटक झाली आहे.
Lakhimpur Kheri
Lakhimpur Kheri

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी आणखी एका भाजप नेत्यासह चौघांना गडाआड केले आहे.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी आशिष अटक करण्यात आली असून, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आशिष मिश्रासह लव कुश, आशिष पांडे आणि भारती या चौघांना अटक झाली आहे. पोलिसांनी आता स्थानिक भाजप नेता सुमित जयस्वाल याच्यासह शिशुपाल, नंदन सिंह बिष्ट आणि सत्य प्रकाश त्रिपाठी यांना अटक केली आहे. लखीमपूर पोलिस आणि गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

Lakhimpur Kheri
गृहखातं कसं असतं?, असं जयंत पाटलांनी विचारलं अन् आबांनी अशी टाकली गुगली...

वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सत्य प्रकाश त्रिपाठी याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे सापडली आहेत. सुमित जयस्वाल हा शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एका गाडीमध्ये असल्याचे व्हिडीओत दिसून आले आहे. तो एका गाडीतून उतरत पळून जाताना दिसते.' तर शेतकऱ्यांनी जोरदार दगडफेक केल्याने संतुलन सुटल्याने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी गेल्याचा दावा सुमितने केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

Lakhimpur Kheri
खतगांवकर सोबत असते तर मी प्रचारालाही आलो नसतो; चंद्रकांतदादांची कबुली

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com