मंत्रिपुत्राला जामीन देत उच्च न्यायालयाने पोलिसांवरच ओढले ताशेरे

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते.
Ashish Mishra
Ashish MishraSarkarnama

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. राज्यातील ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीतच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याचवेळी न्यायालयाने पोलीस तपासावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

उच्च न्यायालयाने जामिनाच्या आदेशात तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहता एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आशिष मिश्राने गोळीबार केला. परंतु, तपासात गोळ्या झाडल्यामुळे कोणतीही जखम एकाही मृताच्या अंगावर नाही. याचबरोबर गोळीबारात जखमी झालेली एकही व्यक्ती नाही. आशिष मिश्राने गाडीच्या ड्रायव्हरला चिथावणी देऊन आंदोलकांना चिरडण्यास भाग पाडले, असे सरकारी पक्ष म्हणते आहे. मात्र, हा ड्रायव्हर आणिइतर दोघे आंदोलकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडले आहेत. याचबरोबर या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून, त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे.

Ashish Mishra
जामिनावर सुटताच नितेश राणे म्हणाले, मला अटक झालीच नाही!

या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) हा पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणात आशिष मिश्रा याच्यावर आधी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल झाला होता. याबाबत एसआयटीने या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात अहवाल सादर केला होता. या प्रकरणी एसआयटीने तब्बल 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आशिष मिश्राने 3 ऑक्टोबरला 4 शेतकरी आणि एका पत्रकाराला चिरडले होते. यानंतर झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार झाले होते. त्यातील दोन भाजपचे कार्यकर्ते होते.

Ashish Mishra
'ग्लोबल टीचर' डिसले गुरूजी आता थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार!

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात वर्षभराहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करीत होते. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com