Arvind Kejriwal : निवडणुकीआधी केजरीवालांच्या अडचणीत वाढ? निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, विचारले हे पाच प्रश्न

Arvind Kejriwal Election Commission Questions : हरियाणामधील भाजप सरकारवर यमुना नदीचे पाणी विषारी केल्याचा आरोप केला आहे. या विधानामुळे निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये 5 प्रश्न विचारले आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली निवडणुकीपूर्वी 'आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी हरियाणामधील भाजप सरकारवर यमुना नदीचे पाणी विषारी केल्याचा आरोप केला आहे. या विधानामुळे निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये 5 प्रश्न विचारले आहेत.

या पाच प्रश्नांची उत्तरे द्यायला सांगतली आहेत.

  • हरियाणा सरकारने यमुना नदीत कोणत्या प्रकारचे विष मिसळले?

  • ज्या विषामुळे हत्याकांड घडले असेल त्याचे प्रमाण, स्वरूप आणि शोधण्याच्या पद्धतीचे पुरावे काय आहेत?

  • विष कुठे सापडले?

  • दिल्ली जल बोर्डाच्या कोणत्या अभियंत्यांनी ते कुठे आणि कसे ओळखले?

  • दिल्लीत विषारी पाणी येण्यापासून रोखण्यासाठी अभियंत्यांनी कोणती पद्धत अवलंबली?

Arvind Kejriwal
Nitish Kumar Son Political Entry : नितीश कुमार यांचा मुलगा राजकारणात येणार का? अखेर उत्तर मिळाले, पक्षानेच मांडली भूमिका

यमुनेबाबत काय वाद आहे?

27 जानेवारी रोजी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून (Hariyana) दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. केजरीवाल म्हणाले होते, 'लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही. भाजप आपल्या घाणेरड्या राजकारणाने दिल्लीतील लोकांना तहानलेले ठेवू इच्छित आहे. ते हरियाणाहून पाठवल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळत आहेत.

केजरीवाल पुढे म्हणाले, 'हे प्रदूषित पाणी इतके विषारी आहे की दिल्लीत असलेल्या जलशुद्धीकरण संयंत्रांच्या मदतीने ते प्रक्रिया करता येत नाही. भाजप दिल्लीतील रहिवाशांची सामूहिक हत्या करू इच्छित आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही.

Arvind Kejriwal
Raj Thackeray : 'त्यांनी केलं ते प्रेम, पण आम्ही केलं ते बलात्कार'; बदलत्या भूमिकेवर राज ठाकरे यांचा घणाघात

भाजप-काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

अरविंद केजरीवाल यांच्या या विधानानंतर भाजप आणि काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दोघांनीही केजरीवालांच्या दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर, निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती. त्यांच्या विधानांच्या समर्थनार्थ पुरावे देण्यास सांगितले होते. केजरीवाल यांना यापूर्वी 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com