CJI DY Chandrachud : कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही वाटतेय 'या' गोष्टीची भिती...

CJI DY Chandrachud news| "देशाच्या न्याय व्यवस्थेच्या बाबतीत जिल्हा न्यायालये ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांइतकीच महत्त्वाची आहेत."
CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachud
Published on
Updated on

CJI DY Chandrachud news| नवी दिल्ली : कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांनी जामीन न दिल्यामुळे उच्च न्यायालये जामीन अर्जांनी भरून गेली आहेत. पण टार्गेट होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात, असे धक्कादायक वक्तव्य भारताचे (India) नवनिर्वाचित सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी केलं आहे. याचवेळी त्यांनी न्यायालयांमधील प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. शनिवारी बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावर डी.वाय चंद्रचूड यांनी माजी सीजेआय यु यु ललित यांच्याप्रमाणेच देशातील कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्यास विलंब होऊ नये आणि न्यायालयातील प्रलंबित खटले लवकर निकाली काढावेत, यासाठीआपणही प्रयत्न करत आहोत. असे CJI चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

CJI DY Chandrachud
शिवसेनेने आरोप केलेल्या ‘त्या’ अभियंत्यांची ‘नगरचना’तून बदली

तसेच, 'देशाच्या न्यायव्यवस्थेत जिल्हा न्यायालये जितकी महत्त्वाची आहेत तितकीच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची आहे. कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात. त्यांना गुन्ह्याचे गांभीर्य समजत नाही म्हणून नाही, तर अनेक जघन्य प्रकरणात जामीन मिळाल्यास त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भिती त्यांना वाटते. त्यांच्या भितीमुळेच उच्च न्यायालये जामीन अर्जांनी भरून गेली आहेत. जिल्हा न्यायालयांवर विश्वास ठेवायला शिकण्याची गरज आहे. न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकांच्या गरजा खऱ्या अर्थाने पूर्ण होतील, असा विश्वास डी.वाय चंद्रचूड यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू हेदेखील यावेळी उपस्थित होते. ''बदल्यांबाबत सरन्यायाधीशांना भेटण्याची अनेक वकिलांची इच्छा असल्याबद्दल रिजिजू यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की 'बदलीबाबत काही वकील सरन्यायाधीशांना भेटू इच्छितात. ही वैयक्तिक बाब असू शकते, पण स्वतंत्रपणे पाहिल्यास अनेक मुद्द्यांमध्ये हा एक मुद्दा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी गुजरात हायकोर्ट बार असोसिएशनच्या वकिलांची सध्याची कामगिरी पाहता 21 नोव्हेंबरला भेटण्यास सहमती दर्शवली आहे. हे वकील न्यायमूर्ती निखिल एस. करियाल यांची पाटणा उच्च न्यायालयात बदली करण्याच्या कॉलेजियमच्या शिफारशीला ते विरोध करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com