
New Delhi Railway Station stampede : मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंरगीची घटना ताजी असतानाच शविवारी (ता.15) रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर महाकुंभसाठी निघालेल्या 18 प्रवाशांचा चेंगराचेंगरीत (New Delhi stampede) मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
तर या घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो. अशी भिती देखील व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.
दिल्लीतील (Delhi) चेंगराचेंगरीला रेल्वे जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लालू प्रसाद यांनी दिल्लीतील चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक दुःखद घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो.
रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे. हे सर्व रेल्वेचे अपयश आहे. याची जबाबदारी रेल्वेमंत्र्यांनी घ्यावी." मात्र, यावेळी महाकुंभ मध्ये होणाऱ्या गर्दीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी महाकुंभाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वादामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महाकुंभासाठी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर बोलताना, "कुंभ फालतू आहे, त्याला काही अर्थ आहे का?"; असं वादग्रस्त वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. दरम्यान, काल रात्री दिल्लीत झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांपैकी 18 जणांपैकी 9 जण बिहारमधील आहेत. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.