![Lok Sabha Election 2024 Exit Poll](http://media.assettype.com/sarkarnama%2F2024-06%2F9b483bfc-3642-4252-b0b5-a989465e9ec7%2FLok_Sabha_Election_2024_Exit_Poll.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Lok Sabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. एनडीए 350 चा आकडा गाठत असताना इंडिया आघाडी 150 जागा मिळवेल, असा अंदाज आहे. मात्र, एक्झिट पोल मॅनेज केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
सध्याचे पंतप्रधान हे चार जूनला नक्की जाणार आहेत. त्यांनी ट्विट देखील तयार ठेवले असेल. त्यांचीच षडयंत्र रचून एक्झिट पोलचे आकडे मॅनेज केले आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.
इंडिया आघाडीच्या नेत्यांची काल बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक राज्यानुसार आम्ही आकड्यांचे विश्लेषण केले. इंडिया आघाडीला 295 जागा मिळत आहेत. 295 पैकी महाविकास आघाडीला Mahavikas Aghadi एकही जागा कमी मिळणार नाही.
एक्झिट पोलच्या माध्यमातून आमच्यावर मानसिक दबाव आणण्याचा खेळ खेळत आहे. विद्यमान गृहमंत्री निकालाच्या दोन दिवस आधी 150 डीए, जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत आहेत. आपले सरकार जाणार यातूनच ते दबाव आणत असल्याचा दावा रमेश यांनी केली.
कर्नाटकामधील एक्झिट पोल पाहून आम्हाला हसू आले. मी कर्नाटकमधून राज्यसभेचा खासदार आहे. इंडिया आघाडी 295 पेक्षा एकही जागा कमी जिंकणार नाही, असा दावा रमेश Jairam Ramesh यांनी केला.
चार जूनला निकाल लागेल तेव्हा सगळ्यांची तोंड गप्प झालेलं असेल. एक्झिट पोलची आकडे आणि निकाल यांच्यामध्ये मोठा फरक असल्याचा दावा देखील जयराम रमेश यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.