MP Varun Gandhi and CM Yogi Adityanath.
MP Varun Gandhi and CM Yogi Adityanath.

भाजप नेत्याचं योगींना खरमरीत पत्र

लखीमपूर खीरी येथे रविवारी एका घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या घटनेचा भाजपचे खासदार वरूण गांधी यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खरमरीत पत्र लिहिलं असून त्यात या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची सर्वोच्च न्यायालायच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही वरूण गांधी यांनी केली आहे.

लखीमपूर खीरी येथे रविवारी एका घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं गाडीखाली त्यांना चिरडल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. काँग्रेसकडून या घटनेविरोधात देशभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, या घटनेवर बहुतेक भाजप नेत्यांनी चुप्पी साधली आहे. पण भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी थेट योगींना पत्र लिहितं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

MP Varun Gandhi and CM Yogi Adityanath.
भाजपचे मुख्यमंत्री अडचणीत; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेतकऱ्यांना निर्दयतापूर्वक चिरडण्याची घटना हृदयद्रावक आहे. त्यामुळं देशभरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या घटनेच्या एक दिवस आधीच अहिंसेचे पुजारी महत्वा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी लखीमूपर खीरीमध्ये आपल्या अन्नदातांचा हत्या करण्यात आली. हे सभ्य समाजात अक्षम्य आहे. आंदोलन करणारे शेतकरी आपलेच नागरीक आहे, असं वरूण गांधी म्हणाले आहेत.

शेतकरी जर आंदोलन करत असतील तर संयम आणि धैर्याने त्यांच्याशी चर्चा करायला हवी. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांशी केवळ आणि केवळ गांधीवादी व लोकशाही मार्गाने, कायद्याचे पालन करत वागायला हवे, असंही गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातील आरोपांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत या घटनेची चौकशी व्हावी. तसेच पिडीत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. यापुढील काळात अशा घटना घडू नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनी केली आहे. त्यामुळे खट्टर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजप किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खट्टर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाचशे ते हजार लोकांचे गट बनवून जशास तसे उत्तर देण्यासाठी भडकवल्याचं समोर आलं आहे. तुरूंगात गेला तर मोठे नेते बनाल, असंही ते कार्यकर्त्यांना सांगत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com