Pahalgam Terror Attack Update : ''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!

Rahul Gandhi Criticism : जाणून घ्या, पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, मोदी सरकारला उद्देशून काय म्हटले आहे?
Pahalgam Terror Attack Update : ''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!
sarkarnama
Published on
Updated on

Overview of the Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर दहा पेक्षा अधिकजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेतली असून, सौदी अरेबियाहून गृहमंत्री अमित शाह यांना थेट फोन लावला आणि तातडीने घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले. शिवाय, तेथील सद्य परिस्थितीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचेही सांगितले आहे. याचबरोबर अमित शाह यांनीही ताताडीने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

Pahalgam Terror Attack Update : ''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला : मोदींनी सौदी अरेबियाहून अमित शहांना लावला फोन अन् दिला 'हा' मोठा आदेश!

दरम्यान या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राहुल गांधींनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी अतिशय निंदनीय आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे. मी शोकाकुल कुटुंबीयांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटेल अशी अपेक्षा करतो.

Pahalgam Terror Attack Update : ''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!
Jagdeep Dhankhar News : ‘संसदच सर्वोच्च, त्यापेक्षा...’, उपराष्ट्रपती धनखड पुन्हा न्यायालयावर बरसले

तसेच, दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण देश एकजुट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी आता सरकारने जबाबदारी स्वीकारत ठोस पावलं उचलावीत. जेणेकरून अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना अशाप्रकारे आपला जीव गमावावा लागू नये.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या एका पीडित महिलेने एक खळबळजनक विधान केलं आहे. या महिलेने सांगितले आहे की, दहशतवाद्यांनी आधी लोकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. महिलेने पीसीआरला फोन केला आणि सांगितले की, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळी मारली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com