इम्रान खान यांचं खुलं आव्हान; थेट पंतप्रधान मोदींशी भिडायचंय…

मॉस्कोच्या आपल्या पहिल्या भेटीआधी त्यांनी रशियातील सरकारी टीव्हीला ही मुलाखत दिली आहे.
PM Imran Khan and PM Narendra Modi
PM Imran Khan and PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी भिडायचं आहे. त्यांनी एका टीव्ही मुलाखतीत तसं आव्हानंच दिलं आहे. पंतप्रधान मोदींशी टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रमात चर्चा करण्यास तयार असल्याचं वक्तव्य खान यांनी केलं आहे. भारत (India) आणि पाकिस्तानमधील मतभेद मिटवण्यासाठी ही चर्चा करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

मॉस्कोच्या आपल्या पहिल्या भेटीआधी त्यांनी रशियातील (Russia) सरकारी टीव्हीला ही मुलाखत दिली आहे. मागील दोन दशकांत पहिल्यांदाच पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान रशियाचा दौरा करत आहेत. मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना खान म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद चर्चेतून सोडवले जाऊ शकतात. ही दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी चांगली गोष्ट असेल. माझा पक्ष तहरीक ए इंसाफ २०१८ मध्ये सत्तेत आला त्यावेळी भारताशी तात्काळ संपर्क केला होता. काश्मीर प्रश्न भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून मिटवण्याबाबत चर्चा केली होती. पण त्यावर भारताकडून सकारात्मक उत्तर मिळालं नाही, असं खान यांनी स्पष्ट केलं.

PM Imran Khan and PM Narendra Modi
मोठी बातमी; नवाब मलिकांच्या घरी ईडीचा छापा; २ तासांच्या कारवाईनंतर घेतले ताब्यात

मी नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीव्हीवर चर्चा करण्यास तयार असल्याचेही खान यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्प्ट केलं. भारतात दहशतवादी संघटनांकडून २०१६ मध्ये पठाणकोट हवाई दलाच्या ठिकाणावर हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध आणखीनच बिघडले आहेत. उरी येथील भारतील लष्कराच्या शिबीरावर झालेल्या हल्ल्यानंतर तर पाकिस्तानबाबत केंद्र सरकारने अधिक कडक पावले उचलण्यास सुरूवात केली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी थेट पाकिस्तानमध्ये घुसत जैश ए मोहम्मदच्या दहशवादी प्रशिक्षण शिबीरावर हल्ला केला. या सर्जिकल स्ट्राईकद्वारे भारताने पाकिस्तानला सूचक इशारा दिला. भारताने २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त केल्यानंतर आणि दोन केंद्रशासित प्रदेशांत त्याची विभागणी केल्यानंतर दोन देशांतील संबंध अधिक ताणले गेले.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आणि यापुढेही राहील, असे भारताकडून पाकिस्तानला सातत्याने ठणकावून सांगितले जात आहे. दहशतवाद, शत्रुता आणि हिंसामुक्त वातावरणासोबत शेजारील देशांशी भारत चांगले संबंध बनवू इच्छित असल्याचे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे. त्यातच इम्रान खान यांच्याकडून पंतप्रधान मोदींशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com