Parliament Session Live : शिवाजी महाराज, आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी खर्गेंनी राज्यसभा दणाणून सोडली...

Mallikarjun Kahrge Chhatrapati Shivaji Maharaj Dr. Babasaheb Ambedkar Rajya Sabha Session : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलत असताना मल्लिकार्जून खर्गे यांनी सरकारला धारेवर धरले.
Parliament Session Live : शिवाजी महाराज, आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी खर्गेंनी राज्यसभा दणाणून सोडली...
Published on
Updated on

New Delhi : संसद परिसरातील महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचे पुतळे हटवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका करत राज्यसभा दणाणू सोडली.

राज्यसभेत बोलताना खर्गे म्हणाले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसह 15 विभूतींचे पुतळे हटवून एका कोपऱ्यात उभे करण्यात आले. लाखो लोक येऊन श्रध्दांजली अर्पण करत होते. पण तिथे आंदोलनं होत असल्याने घाबरून पुतळे हटवण्यात आले.'

Parliament Session Live : शिवाजी महाराज, आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी खर्गेंनी राज्यसभा दणाणून सोडली...
Parliament Session Live : ओम बिर्ला संतापले; राहुल गांधींचा माईक बंद केल्याच्या मुद्द्यावरून खडसावले

मी विद्यार्थी असताना आंबेडकरांच्या पुतळा संसद आवारात बसवण्यासाठी आम्ही लढलो होतो. आंबेडकरांचा पुतळा ससंदेच्या पुढे असावा, यासाठी 1963-64 मध्ये मोठे आंदोलन झाले होते. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आंबेडकरांनी संविधान तयार केले आहे, यासाठी त्यांच्या पुतळ्यासाठी संघर्ष केला होता, असे खर्गे म्हणाले.

महात्मा गांधींसह आंबेडकर व शिवाजी महाराजांचे पुतळे आधी ज्या ठिकाणी होते, तिथे बसवावेत, अशी विनंती खर्गे यांनी केली. त्यांचा अपमान करू नका, यासाठी जोडतो. त्यांचा अपमान केला तर देशाचा, संविधानाचा अपमान असेल. देशातील कोट्यवधी दलित, एससी, एसटी, ओबीसींचा अपमान असेल, असेही खर्गे यांनी सांगितले.

Parliament Session Live : शिवाजी महाराज, आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी खर्गेंनी राज्यसभा दणाणून सोडली...
Parliament Session Live : ओम बिर्ला संतापले; राहुल गांधींचा माईक बंद केल्याच्या मुद्द्यावरून खडसावले

खर्गे यांच्या आरोपांवर बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले. जुन्या संसद भवनाची रचना गोलाकार आहे. त्यामुळे तिथे कुठलाही कोपरा नाही. आवारातील सर्व पुतळे एका ठिकाणी प्रेरणा स्थळी सन्मानाने हलवून स्थापित करण्यात आले आहेत. संसेदत आल्यानंतर लोकांना एकाच ठिकाणी सर्व महान लोकांचे दर्शन करता येते.

आम्ही कुणाचाही अपमान केला नाही, उलट अधिक सन्मान दिला असल्याने चुकीचा समज पसरवू नये, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले. रिजिजू यांच्या या स्पष्टीकरणानंतरही खर्गे आपल्या भूमिकेवर ठाम होते. पुतळे कोणत्या ठिकाणी बसवायचे, हे त्यावेळीच ठरले होते. त्यामुळे ते पुतळे तिथेच असायला हवे, असे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com