पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात अन् प्रियांका गांधी 29 तासांपासून नजरकैदेत

लखीमपूर खीरी येथील घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
Priyanka Gandhi and PM Narendra Modi
Priyanka Gandhi and PM Narendra Modi

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मागील 29 तासांपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. कोणताही आदेश अन् एफआयआरशिवाय पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील राजकारण तापलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. 5) उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत.

लखीमपूर खीरी येथील घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडत वाहनांचा ताफा निघून गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमधील रोष आणखी वाढल्यामुळे उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यातच पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

Priyanka Gandhi and PM Narendra Modi
थरारक : शेतकऱ्यांना चिरडत वाहनांचा ताफा निघून गेला...व्हि़डीओ व्हायरल

लखनऊ येथे 'आझादी@75-न्यू अर्बन इंडिया' या परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. तसेच 75 शहरी विकास प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्यानं लखनऊमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनाही 29 तासांहून अधिक काळापासून नजरकैदेत ठेवण्यात आल्यानं काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

घटनेनंतर काही तासांतच प्रियांका गांधी लखीमपूर खीरीच्या दिशेने निघाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवून ताब्यात घेतले. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. जवळपास 29 तासांपासून त्या तिथे आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना अद्याप शेतकऱ्यांना चिरडणारा व्यक्ती अटक का नाही, असा सवाल केला आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून मंगळवारी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात हे आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या वाहनांच्या ताफ्याने रविवारी (ता.3) आठ जणांना चिरडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यात चार शेतकरी (Farmers) आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र, गृहराज्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावत आपला मुलगा तिथे उपस्थित नव्हता असं म्हटलं आहे. त्यानंतर या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच शेतकरी संघटनांच्या आयटी सेलने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com