अखेर ठरलं! अखिलेश यादवांनी स्वीकारली मोठी जबाबदारी

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh Yadavsarkarnama

दिल्ली : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सत्ता मिळवली असली तरी समाजवादी पक्षानेही आपल्या जागा वाढवत प्रमुख विरोधी पक्षाची जागा घेतली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी ते दोन हात करणार आहेत.

यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवला. याचवेळी समाजवादी पक्षाच्या आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आमदारकीसाठी खासदारकीवर पाणी सोडले आहे. समाजवादी पक्षाच्या आमदारांची बैठक आज झाली. या बैठकीत पक्षाच्या 111 आमदारांनी एकमताने अखिलेश यादव यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. यानंतर अखिलेश यादव हे सहकारी पक्षांशी चर्चा करणार आहेत. सहकारी पक्षांशी चर्चा करून ते आगामी धोरण ठरवणार आहेत. अखिलेश यांनी आता दिल्लीऐवजी उत्तर प्रदेशवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातच राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Akhilesh Yadav
राजकारण तापलं! कोल्हापूर उत्तरच्या एका उमेदवारासाठी भाजपचे चाळीस स्टार प्रचारक

निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षात (Samajwadi Party) वेगवान घडामोडी घडत होत्या. अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. यामुळे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सपाचे विधिमंडळात अखिलेश हेच नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. भाजपला राज्यात टक्कर देण्यासाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. या वेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. आता त्यांनी खासदारकी सोडून राज्यात योगींना टक्कर देण्यासाठी राज्यातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

Akhilesh Yadav
भोपाळींना समलैंगिक म्हणणाऱ्या अग्निहोत्रींना दिग्विजयसिंह म्हणाले, बहुदा तुमचा...

खासदारकीच्या राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले होते की, उत्तर प्रदेशातील कोट्यवधी जनतेने आम्हाला मते दिली आहे. विधानसभा निवडणुकीत आमचा नैतिक विजय झाला आहे. याचा मान राखण्यासाठी मी करहल विधानसभा मतदारसंघातील आमदारकी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी आझमगडच्या विकासासाठीही मी कटिबद्ध आहे. महागाई, बेरोजगार आणि सामाजिक असमानता या विरोधात लढण्यासाठी हा त्याग आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com