खासदाराच्या सुचक ट्विटनंतर शशी थरूर यांनी दिला राजीनामा

शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी रविवारीच राजीनामा दिला आहे.
Shahi Tharoor
Shahi Tharoor Sarkarnama

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Parliament Winter Session) पहिल्याच दिवशी राज्यसभेत बारा खासदारांचे निलंनब करण्यात आले. विरोधकांकडून हे निलंबन रद्द करण्यासाठी आठवडाभर आंदोलन करूनही केंद्र सरकार झुकलं नाही. त्यामुळे निलंबित खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी रविवारी संसद टीव्हीवरील निवेदक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एका खासदाराने काँग्रेसेचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या राजीनाम्याबाबत सुचक ट्विट केलं होतं.

शशी थरूर यांनी या ट्विटनंतर सोमवारी सकाळी चतुर्वेदी यांच्या पावलावर पाऊल टाकलं. शरूर यांनीही संसद टीव्हीवरील 'टू द पॉईंट' या कार्यक्रमाच्या निवेदक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील दोन्ही खासदारांनी निवेदक पद सोडलं आहे. सप्टेंबर महिन्यात दोघांचीही निवेदक म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती केली होती. विरोधी पक्षातील या दोनच खासदारांचा यामध्ये समावेश होता. आता दोघांनीही 12 खासदारांच्या निलंबनाविरोधात राजीनामा दिला आहे.

Shahi Tharoor
चैत्यभूमीवर तणाव; समीर वानखेडेंना जोरदार विरोध, प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

प्रियांका चतुर्वेदी या संसद टीव्हीवरील (Sansad TV) मेरी कहानी कार्यक्रमाचे निवेदन करत होत्या. या कार्यक्रमात महिला खासदारांशी संवाद साधत त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकला जातो. प्रियांका यांनी राजीनामा देताना जिथे माझे प्राथमिक अधिकारच काढून घेण्यात आले आहेत, तिथे या पदावर राहण्यासाठी तयार नसल्याचे म्हटले आहे. बारा खासदारांच्या निलंबनामुळे हे झाल्याचे चुतर्वेदी म्हणाल्या आहेत.

चतुर्वेदी यांच्या राजीनाम्याचे स्वागत विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek Obrien) यांनीही ट्विट करत प्रियांका यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. पण याचवेळी त्यांनी थरूर यांच्याकडेही इशारा केला होता. आता निवेदक म्हणून एक विरोधी खासदार राहिले आहेत. तेही संसदेची थट्टा करणाऱ्या सरकारचा तिरस्कार करतील, असं ओब्रायन यांनी म्हटलं होतं.

थरूर यांनी ट्विट करत निवेदक पद सोडत असल्याचे जाहीर केले आहे. 12 खासदारांच्या निलंबानाचे कारण देत शरूर यांनी निवेदक म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, निलंबनानंतर चतुर्वेदी यांनी सरकारवर जोरदार शरसंधान साधले होते. त्यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याही यावरून वाद घातला होता. पण राज्यसभेचे सभापती आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या चतुर्वेदी यांनी निवेदक पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी राज्यसभेचे सभापती वेंकैय्या नायडू यांना लिहिलं आहे. संसद टीव्हीवरील मेरी कहाणी या कार्यक्रमाच्या निवेदक पदावरून राजीनामा देत असल्याने खूप वेदना होत आहेत. मनमानीपध्दतीने बारा खासदारांचे निलंबन करून संसदेतील त्यांचा सहभाग नाकारण्यात आला आहे. त्यामुळे संसद टीव्हीवरील कार्यक्रमातही मी थांबू शकत नाही. त्यामुळे मी पायउतार होत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com