Odisha Triple Train Accident : रेल्वे अपघातानंतर वरुण गांधींनी खासदारांना केली ही विनंती

Varun Gandhi ON Odisha Train Accident : वरुण गांधी यांनी ओडिशा रेल्वे अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे.
Odisha Train Accident
Odisha Train Accident Sarkarnama

MP Varun Gandhi ON Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर शनिवारी पंतप्रधान मोदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वरुण गांधी यांनी टि्वट करीत खासदारांना सल्ला दिला आहे. त्यांचा हा सल्ला खासदार मान्य करतील का हे लवकरच समजेल.

Odisha Train Accident
BJP Leader Prasanta Basunia Shot Dead : घरात घुसून BJP नेत्यावर गोळी झाडली ; TMC वर संशयाची सुई ; भाजप नेते आक्रमक..

खासदार वरुण गांधी यांनी ओडिशा रेल्वे अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या सहकारी खासदारांकडे एक मागणी केली आहे. ओडिशा रेल्वे अपघातातील पीडित परिवाराना मदत करण्यासाठी खासदारांनी एका महिन्याचा पगार द्यावा, असे वरुण गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

"रेल्वे अपघातात जीव गमावलेल्या व जखमी असलेल्या व्यक्तींच्या परिवारांना पहिल्यांदा आधार मिळाला पाहिजे, त्यानंतर न्याय मिळाला पाहिजे. ओडिशा रेल्वे अपघात हा हृदय विदारक आहे. जो परिवारांना यात धक्का बसला आहे, त्यांच्या पाठिशी समाजाने उभे राहिले पाहिजे. माझी खासदारांनी विनंती आहे की त्यांनी आपल्या एक महिन्याचे वेतन या परिवारांना मदत म्हणून दिले पाहिजे," असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Odisha Train Accident
Pankaja Munde Meets Eknath Khadse : खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट ; "मी वादळाची दिशा.."

या रेल्वे अपघातात आतापर्यंत 283 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, 'हा एक अतिशय वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा अपघात आहे, हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, देव सर्वांना बळ देवो जेणेकरून ते दुःखाच्या वेळी मात करू शकतील.'

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शनिवारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी अपघातग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला.

Odisha Train Accident
Sachin Pilot will launch own party : काँग्रेसमध्ये भूंकप होणार ; 'पायलट' घेणार नवी भरारी ; 'पीके' च्या मदतीने नवा पक्ष ...

यावेळी त्यांनी अपघातानंतर मृतांची आणि जखमींविषयी भीतीही व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांनी 500 हून अधिक मृत्यूची शक्यताही वर्तवली जात आहे. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचा मुद्दा फेटाळून लावला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, सरकारी आकडेवारीनुसार 238 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रात्री पर्यंत मृतांचा आकडा 288 वर पोहोचला असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com