Union Budget 2024 : अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी! राहुल गांधींचा प्रहार...

FM Nirmala Sitharaman Rahul Gandhi Congress : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.
Rahul Gandhi on Union Budget
Rahul Gandhi on Union BudgetSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी एनडीए सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. अनेक मोठ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतूक केले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प कॉपी पेस्ट असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागील अर्थसंकल्पाची कॉपी पेस्ट असल्याची टीका त्यांनी केली आहे. या अर्थसंकल्पाचा ‘AA’ (अदानी-अंबानी) ला फायदा होईल तर सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा नाही, असा निशाणाही राहुल यांनी साधला आहे.

Rahul Gandhi on Union Budget
Union Budget 2024 : पाच वर्षानंतर करदात्यांना दिलासा; 17,500 रुपये वाचणार...

अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावरूनही विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. हा ‘खुर्ची बचाव’ अर्थसंकल्प असल्याचे म्हणत राहुल यांनी इतर राज्यांच्या जीवावर मित्रांना खूष करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी नाराजी राहुल यांनी व्यक्त केली आहे.

राहुल यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही अर्थसंकल्पाला कॉपी पेस्ट म्हटले आहे. मोदी सरकारला नकली अर्थसंकल्पात काँग्रेसच्या न्यायाच्या अजेंड्याला नीट कॉपीही करता आली नाही. मोदी सरकार वाचवण्यासाठी आपल्या आघाडीतील मित्रांना फसवण्यासाठी रेवड्या वाटत आहे. हा देशाच्या विकासाचा नव्हे तर मोदी सरकार बचाव अर्थसंकल्प आहे, असा हल्लाबोल खर्गे यांनी केला.

Rahul Gandhi on Union Budget
Union Budget 2024 : मोदींनी सरकारला केली मजबूत तटबंदी; विरोधकांच्या मनसुब्यांना सुरूंग...

देशातील गरीब, बेरोजगार, शेतकरी, महिला, कष्टकरी, वंचित आणि उपेक्षितांना निराश करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका बसपा अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. देशात निर्माण झालेली गरिबी, बेरोजगारी, महागाई रोखण्यासाठी सरकारकडे कोणतेही धोरण नसल्याचेही मायावती यांनी म्हटले आहे.

चंद्राबाबूंकडून स्वागत

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्याला विशेष पॅकेज दिल्ल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. आंध्र प्रदेशाच्या पुनर्निर्माणाच्यादृष्टीने ही मदत फायदेशीर ठरणार आहे. राज्याच्या गरजा, राजधानीच्या विकासावर भर राज्यातील मागास भागावर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे चंद्राबांबूनी म्हटले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com