मोदींनी नाश्त्याला बोलावलंच नाही अन् केंद्रीय मंत्र्याला डच्चू मिळण्याची चर्चा

लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते.
Narendra Modi and Ajay Mishra

Narendra Modi and Ajay Mishra

Sarkarnama

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राज्यातीला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बोलावलेल्या बैठकीला मिश्रा उपस्थित नसल्याने त्यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षांच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे पूर्व उत्तर प्रदेशातील भाजपच्या 40 खासदारांना मोदींनी नाश्त्यासाठी बोलावले होते. या बैठकीत मोदींनी राज्यातील भाजपची स्थिती आणि लखीमपूर खीरीनंतर निर्माण झालेली परिस्थिती याबद्दल खासदारांकडून जाणून घेतले. मात्र, या बैठकीला पूर्व उत्तर प्रदेशातील अजय मिश्रा हे उपस्थित नव्हते. ते या बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांना लवकरच मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे.

राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. यानुसार पंजाब व हरयाना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची निवड केली होती. ते या प्रकरणाच्या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवून तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि योग्य होईल, याची काळजी घेत आहेत. याचबरोबर या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने केला होता. यात एस.बी.शिरोडकर, दिपेंदरसिंह आणि पद्मजा चौहान या तिघांचा समावेश आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi and&nbsp;Ajay Mishra</p></div>
कर्नाटकातील आमदारानं काँग्रेसला दिल्लीत पाडलं तोंडावर

एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यावर आधी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एसआयटीने या प्रकरणाच्या सुनावणी असणाऱ्या न्यायाधीशांसमोर अहवाल सादर केला आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi and&nbsp;Ajay Mishra</p></div>
वादग्रस्त वक्तव्य भोवलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याला विधानसभेत मागावी लागली माफी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com