मंगळावर असला तरी परत आणू! विद्यार्थी युध्दभूमीत अन् केंद्रीय मंत्र्यांची फुशारकी

रशियाने युक्रेनविरोधात युध्द पुकारल्याने हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करत आहेत.
V. K. Singh
V. K. SinghSarkarnama

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरोधात युध्द (Russia -Ukraine War) पुकारल्याने हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करत आहेत. केंद्र सरकारकडून अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी हजारो नागरिकांपर्यंत अजूनही पोहचणे शक्य होत नाही. त्यातच केंद्रीय मंत्री व भाजपचे (BJP) नेते फुशारक्या मारत आहेत.

भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत चार केंद्रीय मंत्र्यांना या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri), ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), किरेन रिजिजू (Kiren Rijiju), आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह (V. K. Singh) या चार मंत्र्यांचा यामध्ये समावेश असल्याचे समजते.

V. K. Singh
Russia-Ukraine War : पंतप्रधान मोदी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार युक्रेन मोहिमेवर

व्ही. के. सिंग हे सोमवारी रात्री पोलंडकडे रवाना होणार आहेत. ते तिथून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी समन्वय साधणार आहेत. याविषयी बोलताना सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. मी आज रात्री रवाना होणार आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युध्दक्षेत्रामध्ये बंधने आहेत, संभ्रम असून सीमांवरही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि सुचनांचे पालन न केल्यास चुकीचे होऊ शकते, असंही सिंह यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना सिंह म्हणाले की, तुम्ही मंगळावर (Mars) अडकला असला तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी हे याबाबतीत खूपच दुरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहायला हवे, असेही सिंह म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत युक्रेनमधून १४०० भारतीयांना परत आणण्यात आले आहे. तर जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सीमांवर न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com