मोठी घडामोड : अखिलेश यादव, आझम खान यांच्यानंतर आता योगींचाही राजीनामा

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, आझम खान यांच्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिले आहे.
 Yogi Adityanath
Yogi Adityanathsarkarnama

दिल्ली : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज एकाच दिवशी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि त्यांच्या पाठोपाठ पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान (Azam Khan) यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही विधान परिषदेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Yogi Adityanath resigns from MLC)

यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला. सपा आघाडीला 125 जागांवर समाधान मानावे लागले. योगींचा शपथविधी 25 मार्चला होण्याची शक्यता आहे. त्याआधी योगींनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. योगी 2017 मध्ये मुख्यमंत्री झाले, त्यावेळी ते गोरखूपरचे खासदार होते. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते विधान परिषदेवर 2017 मध्ये बिनविरोध गेले होते. या वेळी पहिल्यांदाच योगींनी विधानसभा निवडणूक लढवून ती जिंकली आहे. त्यांनी गोरखपूर शहर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते विधानसभेवर निवडून आल्याने त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला आहे. राज्यात कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत आलेले योगी आदित्यनाथ हे मागील 37 वर्षांतील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

 Yogi Adityanath
कोल्हापूर उत्तरवर शिवसेनेचा दावा कायम राहणार; संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षातील (Samajwadi Party) घडामोडी वाढल्या आहेत. अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सपाचे विधिमंडळात अखिलेश हेच नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला राज्यात टक्कर देण्यासाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. आता खासदारकी सोडून राज्यात योगींना टक्कर देण्यासाठी त्यांनी राज्यातच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. अखिलेश यांच्या पाठोपाठ आझम खान यांनी खासदारकीवर पाणी सोडत विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश आणि खान या दोघांनीही एकाच दिवशी खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

 Yogi Adityanath
धामी यांच्यामुळं मौर्य यांनाही लॉटरी; हरूनही उपमुख्यमंत्रिपद राहणार कायम

अखिलेश हे करहल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांना जवळपास दीड लाख मतं मिळाली. भाजप उमेदवाराला त्यांनी सुमारे ६७ हजार मतांनी पराभूत केलं आहे. अखिलेश हे निवडून आले असले तरी राज्यात सत्ता न मिळाली नाही. ते आझमगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही करत होते. विधानसभा निवडणुकीत आझम खान हे रामपूर मतदारसंघातून सुमारे ५५ हजार मताधिक्याने निवडून आले आहेत. सध्या ते रामपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. निवडणुकीआधी आझम खान यांच्यावर जल निगम भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com