विक्रम गोखलेंनी केलं कंगनाचं समर्थन, म्हणाले..

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी मात्र, कंगनाची (kangana ranaut) पाठराखण केली आहे. तिच्या विधानाचं गोखलेंनी समर्थन केलं आहे.
kangana ranaut ,vikram gokhale
kangana ranaut ,vikram gokhalesarkarnama

पुणे : वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिनं नुकतेच केलेल्या विधानावरुन वाद पेटला आहे. समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी तिच्यावर हल्लाबोल केला आहे. काही राजकीय नेत्यांनी तिच्यावर टीका केली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी मात्र, कंगनाची (kangana ranaut) पाठराखण केली आहे. तिच्या विधानाचं गोखलेंनी समर्थन केलं आहे.

ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ७५ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केलं. आता कंगनानंतर गोखलेंवरही टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विक्रम गोखले म्हणाले, ''कंगना जे म्हणाली ते खरंय, मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो,'' यावेळी गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तृती केली.

राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही, जे सत्तर वर्षात झालं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करीत आहेत. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र (BJP Shiv Sena alliance) आल्यास फार बरं होईल,'' असे मत विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांनी व्यक्त केलं.

''शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे, याबाबत मी पुढाकार घेतला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं,'' असे गोखले म्हणाले. ''मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

kangana ranaut ,vikram gokhale
कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!

विक्रम गोखले म्हणाले, ''कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही, ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे ? माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही,''

*लाल बहादूर शास्त्री सोडून मी देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो, पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते, ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो.किती वर्षे कारस्थान आहे ? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे,'' असे गोखले म्हणाले.

''देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरीता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही

मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हतो आणि नसेन,'' असे विक्रम गोखले यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com