सांगली : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार हे लोकाभिमुख आहे. मंत्रिपद मिळणार का, या गोष्टी ठरवण्याचे आपल्या हातात नाही. मात्र, जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद असेल तर मिळून जाईल, असे स्पष्ट मत शिवसेनेचे खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले.(Anil Babar Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले अनिल बाबर हे त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. त्यांनी आज मतदारसंघातील लोकांची भेटी घेण्याबरोबरच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मतदारसंघातील काही प्रश्नांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.(Shivsena News)
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार लोकाभिमुख आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बाबर यांनी दिली. जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार का, या प्रश्नावर बोलताना या गोष्टी ठरवण्याच्या आपल्या हातात नाहीत. मात्र, जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद असेल तर मिळून जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.