Shahu Maharaj :शाहू महाराजांच्या विजयाचे श्रेय सतेज पाटलांचे नव्हे पी. एन. पाटलांचे, मुन्नानी चिमटा काढला

Kolhapur Lok Sabha Result : कोल्हापूर लोकसभेच्या निकालावर खासदार धनंजय महाडिक यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मतदार हा राजा आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी ठरवलं माझा पराभव झाला.
Kolhapur Loksabha Politics
Kolhapur Lok Sabha Politics Sarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभेच्या निकालावर खासदार धनंजय महाडिक यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मतदार हा राजा आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी ठरवलं माझा पराभव झाला. मागच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा काही रोल आहे. असं मी मानत नाही..

या निवडणुकीतही दक्षिण मतदारसंघात त्यांचा प्रभाव दिसला नाही. या निवडणुकीत सर्व श्रेय पी एन पाटील यांना द्यावे लागेल. करवीर मधून 71 हजारांचे मताधिक्य त्यांनी दिलं आहे. सतेज पाटील यांना श्रेय देता येणार नाही. अशा शब्दात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचा चिमटा काढला आहे. ते महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर कोल्हापूरात बोलत होते.

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवाची भाजप राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कारण स्पष्ट केले. तब्बल 6 लाख मते मंडलिक यांना पडलेत त्यावद्दल सर्वांचे आभार. तीन पक्षाची ताकद लावली मात्र विशिष्ट वर्गाच्या लोकांचा काँग्रेसकडे कल आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. तोच निकाल कोल्हापुरात पाहायला मिळाला. श्रीमंत शाहू महाराज असल्यामुळे तो एक सकरात्मक मुद्दा काँग्रेसला मिळाला. पण जे मताधिक्य त्यांना मिळालं ते अधिक मिळालं. कागल आणि चंदगड मतदारसंघातून महायुतीला मताधिक्य मिळेल असं अपेक्षित होतं. मात्र कागलमधून केवळ 14 हजारांचं मताधिक्य मिळालं चंदगड मध्ये मिळालं नाही. राधानगरी भुदरगड आणि करवीर तालुक्यातून काँग्रेसला मताधिक्य अधिक मिळाल्याचे महाडिक यांनी सांगितले.

Kolhapur Loksabha Politics
Pune Congress : मोहोळ जिंकले पण सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे डेंजर 'झोन' मध्ये

सत्तास्थपानेवर बोलताना महाडिक यांनी, देशात एनडीए सत्ता स्थापन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदीच  होणार. इंडिया आघाडी क्षणभंगुर आहे.थोड्या दिवसात कालबाह्य होईल. त्यांच्यात पटत नाही, थोड्या दिवसात त्यांच्यात मारामाऱ्या सुरू होतील.शिंदे आणि अजित पवार यांना मतदारांनी नाकारलं असं म्हणता येणार नाही. मतदार हा राजा असतो त्यांच्या मानत काय असतं हे सांगता येतं नाही. जे लोक कधीच पराभूत होणार नाही असं वाटत होतं ते लोक पराभूत झालेत. मतदारांच्या मनात काय असतं हे कधीच कोणी ओळखू शकत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.

काँग्रेस नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले. संविधान बदलणार असं चुकीचा प्रचार केला गेला. काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नव्हता, विकासाचा तर मुद्दा नव्हताच. लोकांच्यात संभ्रम कसा निर्माण करायचा यासाठी त्यांनी हे संविधानाचं कार्ड काढलं. काँग्रेसच्या नेरिटिव्ह सेट करण्याच्या थेरी ला काही लोक बळी पडले. अशी टीकाही खासदार महाडिक यांनी केली.

लोकसभेची निवडणूक वेगळी आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते.या निवडणुकीचा कोणताही परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही. विधानसभेला सुद्धा दहाच्या दहा जागा आम्ही महायुती म्हणून लढवू. भारतीय जनता पक्षाचे खूप मोठे नेटवर्क आता तयार झाला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ठरतील त्यांच्या पाठीशी आम्ही  उभे राह, असेही महाडिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com