Ahmednagar Water Crisis: विखे स्पष्टच म्हणाले, मराठवाड्यात आणीबाणीची परिस्थिती नाही, समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय...

Radhakrishna Vikhe Patil : संघर्ष टाळून हा प्रश्न चर्चतून सोडविला पाहिजे, असे आवाहन विखे यांनी मराठवाड्यातील आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय नेते मंडळींना केले आहे.
Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Nagar Latest News : यंदा नगर-नाशिकसह राज्यात अनेक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला असताना रब्बी कडूनही जास्त आशा नाही. अशात धरणातील पाणी वर्षभर पुरेल अशा पद्धतीने नियोजन करून सोडावे लागणार आहे.

समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर-नाशिक धरण समूहातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात आठ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काढला आहे. यामुळे निर्माण झालेल्या संघर्षावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb Thorat
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची पुण्यात जंगी सभा; मंत्री भुजबळांचा घेणार समाचार ?

जलसंपदा विभागाचा आदेश निघाल्यानंतर कुठल्या धरणात सद्यस्थितीत किती पाणी उपलब्ध आहे, यावर चर्चा सुरू झाली असून, जायकवाडी धरणात सध्या उपलब्ध असलेले पाणी पाहता मराठवाड्यात पाण्याच्या बाबतीत आणीबाणीची परिस्थिती नसल्याचे स्पष्ट मत विखे यांनी मांडले आहे. समन्यायी पाणी वाटप करत असताना निर्माण होत असलेला संघर्ष टाळून हा प्रश्न चर्चेतून सोडविला पाहिजे, असे आवाहन विखे यांनी मराठवाड्यातील आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय नेते मंडळींना केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदा सर्वत्रच कमी पाऊस झालेला आहे. अशात कायद्याच्या जागी हा प्रश्न असला तरी सरकार आपली भूमिका मांडेल. कायद्याच्या चाकोरीतून काय करावे लागेल हेही पाहावे लागेल. मात्र पाणी वरच्या भागाला जसे हवे तसे खालच्या भागाला पण गरजेचे आहे. शेवटी हा विषय मराठवाड्यातील नेत्यांनी प्रादेशिक आणि प्रतिष्ठेचा न करता आपण एकाच राज्यातील रहिवासी आहोत, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे असे विखे म्हणाले.

जायकवाडीला पाणी देणे या विषयावर कायदेशीर बंधने आहेत. मात्र पिण्याचे पाणी पुढील वर्षांपर्यंत पुरले पाहिजे, याकडेही लक्ष द्यावे लागेल. जायकवाडीमध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी सध्या पाणी पुरेसे आहे. लगेच पाणी सोडावे अशी आणीबाणीची परिस्थिती नाही. मात्र कायद्याची बंधने यात आहेत. न्यायालयाच्या चाकोरीतून आग्रही भूमिका आपण मांडत आहोत. सरकार आपली भूमिका मांडत आहे. मात्र हा विषय मराठवाड्यातील नेत्यांनी प्रतिष्ठेचा करू नये, असे आवाहन विखे यांनी केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb Thorat
Maharashtra Politics : रामदास कदमांनी उरल्यासुरल्या राजकारणाची चव घालवली अन् स्वतःची शोभा करून घेतली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com