

BJP Mahayuti government criticism : 'एआय'मुळे (कृत्रिम बुद्धिमत्ता) महाराष्ट्रात किती नोकर कपात झाली आहे, यावर भाजप महायुती सरकारचा अभ्यास नसल्याचं समोर आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी यावर प्रश्न विचारला होता.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 'एआय'मुळे नोकऱ्या जात असल्याचा अद्याप एकही अहवाल मिळाला नसल्याचे सांगितले. यावरून विरोधकांनी एआय परिणामांचा अभ्यास राज्य सरकार करत नसल्याचं अत्यंत दुर्दैवी आहे, अशी जोरदार टीका केली.
जगभरात एआय आणि त्यामुळे होणारी नोकर कपात आज चर्चेचा विषय आहे. हाच मुद्दा विधान परिषदेमध्येही चर्चेत आला. परंतु, या मुद्द्यावर राज्य सरकारने (Government) अद्याप अभ्यासच केला नसल्याचे उत्तर विरोधकांना मिळाले. त्यामुळे हे दुर्दैव असल्याचे नमूद करीत विरोधकांनी विधान परिषदेत नाराजी व्यक्त केली.
आमदार कृपाल तुमाने आणि अन्य काही जणांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा मांडला. ‘एआय’मुळे नोकऱ्या जात असल्याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागण्यात आले. याबाबत सरकारने काही अध्ययन केले आहे का? तसेच ‘एआय’च्या दृष्टिकोनातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या काय संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असा प्रश्न केला.
उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिलेल्या छापील उत्तरात ‘एआय’मुळे नोकऱ्या जात असल्याचा एकही अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही. त्याबाबत अद्याप स्वतंत्र अध्ययन करण्यात आले नाही, असे सांगितले. मंत्री सामंत यांच्या या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला. ‘एआय’ संपूर्ण जग बदलून टाकत आहे. त्याचा नोकऱ्यांवर होत असलेल्या परिणामाचा राज्य सरकारने अभ्यास न करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले.
‘लवकरच एआय धोरण आणू’
सरकार लवकरच ‘एआय धोरण’ जाहीर करणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र, अद्याप धोरण आले नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. यावर उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी धोरण लवकरच येईल, असे आश्वासन दिले. तसेच ‘एआय’, ‘मशीन लर्निंग’, ‘ऑटोमेशन’, ‘क्लाऊड कंप्युटिंग’, ‘बिग डेटा’ या माध्यमातून पुढील पाच वर्षांत पाच लाख रोजगारनिर्मिती केली जाईल, असे आश्वासनही दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.