Ajit Pawar's NCP : उद्धव ठाकरेंप्रमाणेच महायुतीतील एका पक्षाचा स्वबळाचा नारा? बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ

Sthanik Swarajya Sanstha Elections : आगामी होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पण आता या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Elections to Self-Governing Bodies : शनिवारी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून स्वबळाचा नारा दिला. यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून काँग्रेससह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपली भूमीका स्पष्ट केली आहे. दरम्यान आता स्वबळाचा नारा फक्त आघाडीपुरता मर्यादीत राहिला नसल्याचे समोर आले असून याचे वारे महायुतीत देखील वाहत असल्याचे समोर आले आहे. महायुतीत देखील आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून स्वबळाचा नारा एका मोठ्या नेत्याने दिला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उत आला आहे.

स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत पक्षातील जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी स्वबळावर लढल्यास त्याचा पक्षाला फायदा होऊन शकतो, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत देखील फुटीचे तडे गेल्याचे म्हटले जात आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Local Self Government Elections : स्थानिक गट टिकवण्याची नेत्यांची परीक्षा; सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा नारळ फुटणार

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादीची बैठक माटुंग्यात शनिवारी (ता.11) पार पडली. यानंतर यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला. महापालिका स्वबळावर लढली पाहिजे, अशी मागणी बैठकीत केली. यावेळी नवाब मलिक, आमदार सना मलिक आणि सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. या शिवाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नवाब मलिक यांनी स्वबळावर लढण्याची आक्रमक भूमीका घेतली. तसेच त्यांनी, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत मुंबईतील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत म्हणावे तसे यश आलेले नाही. आपले कधीच 14 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले नाहीत. याआधी देखील आपली दुसऱ्या पक्षांची युती होती. तरीदेखील कधीच जास्त नगरसेवक निवडून आलेले नाहीत. त्यातच आता राष्ट्रवादीत फुट पडली असून यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चिंता आहे. कार्यकर्ते संभ्रमित असून महापालिका निवडणूक स्वबळावर लढायचं की नाही हा पेच महायुतीत अद्याप कायम असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Raut : पक्ष फोडणे भाजपच्या कुठल्या आयडॉलॉजीत बसते? संजय राऊतांचा खडा सवाल

...तोपर्यंत कोणीही विचारत नाही

यावेळी मलिक यांनी महायुतीतील मित्र पक्षांच्या सहकार्यावर प्रश्न उपस्थित करताना, आपल्या पक्षाची जोपर्यंत तादक वाढत नाही, तोपर्यंत पक्षाला मित्र पक्ष देखील विचारात घेत नाहीत. यामुळे आपले मित्र पक्ष आपल्याला सोबत घेतील हे विसरून जा, असा इशारा दिला आहे. आपल्या पक्षाची ताकद निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागेल, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com