
Mumbai News : संपूर्ण राज्याला हादलवणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात नवी अपडेट समोर आली असून सीआयडी व तपास पथक मुंबईपर्यंत पोहचले आहेत. यामुळे या प्रकरणात नवा उलगडा झाला असून पुण्यानंतर भिवंडी कनेक्शन समोर आले आहे. यामुळे सरपंच देशमुख हत्याप्रकरणात नवे धागे-दोरे उलगड असून सीआयडी व तपास पथकांनी दोघांची चौकशी केल्याची माहिती मिळत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे अख्या राज्यात संताप व्यक्त केला जात असून आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. तसेच आरोपींनी फाशी देण्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आज (ता.6) याच प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची भेट घेणार असून ते कोणती मागणी करतात आणि राज्यपाल याकडे कसे पाहतात याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागले आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराड, जयराम चाटे, महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची अटक झाली आहे. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार असून त्याचा शोध सर्व तपास पथके घेत आहेत.
दरम्यान देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आता मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांचे भिवंडी कनेक्शन उघड झाले आहे. याप्रकरणी सीआयडी व तपास पथकांनी भिवंडी गाठलं असून सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार 11 डिसेंबरला भिवंडीत गेल्याचे समोर आले आहे. ते तेथे मूळचा बीडचा असणाऱ्या एका व्यक्तिच्या शोधात गेले होते. मात्र तो न सापडल्याने थेट गुजरात गाठल्याचे उघड झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.