
Mumbai News, 03 Jan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्या जिल्ह्यात दौऱ्यासाठी असतील त्या जिल्ह्यातील अधिकारी इथून पुढे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पुष्पगुच्छ आणणार नाहीत. तसंच मुख्यमंत्र्यांना पोलिस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनीची प्रथा देखील त्यांच्या दौऱ्यादरम्यान बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत.
याबाबतचे एक पत्रक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी काढले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यावेळी स्वागतासाठी पुष्पगुच्छ देणं तसंच पोलिस (Police) मानवंदना देणं बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळं आता इथून पुढे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या नव्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्याबाबत नवी नियमावलीबाबत प्रसिद्ध कलेल्या पत्रात लिहिलं आहे की, "दौर्यात स्वागतासाठी कुणीही पुष्पगुच्छ आणणार नाहीत. दौर्याच्यावेळी पोलिस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा माझ्या दौर्यात बंद ठेवण्यात यावी. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, एसपी, महापालिका आयुक्त, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या नियमावलीचं पालन करावं."
दरम्यान, आता इथून पुढील काळात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यात कोणीही अधिकारी पुष्पगुच्छ घेऊन जाणार नाही. मात्र, ही नियमावली फक्त मुख्यमंत्र्यांपुरती मर्यादित आहे. मात्र, ती इतर मंत्र्यांना लागू होणार की नाही? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.