
Pune News : महाराष्ट्रात जंगलराज निर्माण निर्माण झाले असून दिल्लीत तसे चर्चा केली जातेय. हे हे दुर्दैवी असून याला जबाबदार महायुतीचे सरकार असल्याचा घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकारने महाराष्ट्राला कलंकित केले. राज्यात सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम या सरकारने केले. सरकारमध्ये 65 टक्के गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मंत्री असल्याचा दावा देखील पटोले यांनी यावेळी केला आहे. ते शरद पवार यांच्या भेटीला आले असताना माध्यमांशी बोलत होते. याआधी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
पुढे पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच देखील. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नसल्याचा दावा पटोले यांनी केला. तर राज्याच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री दागी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरील प्रश्नावर उत्तर देताना पटोले यांनी, आम्ही भेटतच असतो. महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल आहे. आमच्यात दुरावा नाही. पण महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यात किती अबोला आहे पहा. त्यांची तोंड कुणीकडे असतात बघा. मग तुम्हाला महायुतीमध्ये किती आलबेल आहे, हे कळेल असा टोला लगावला आहे.
दावोस दौऱ्यावर जावूनही मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राच्या कुजबुजकडे लक्ष असतं असा निशाना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर पेच निर्माण झाल्यानंतर त्यांना या नियुक्त्यांना स्थगिती द्यावी लागल्याचेही पटोले म्हणाले.
तसेच पटोले यांनी, आपल्या राज्यातील राज्याचे एक उपमुख्यमंत्री आपल्या गावात आणि दुसरे कुठे हे मला माहित नसल्याचे टीका करताना, महायुतीमध्ये काहीच ठीक नसल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यात सत्ता आली तेव्हा पेच, खातेवाटपाला उशिर आणि आता पालकमंत्रिपदांनाच स्थगिती आणली आहे. सहपालकमंत्री पद निर्माण करण्यामागे सरकारचा उद्देश हा फक्त मलाई खाण्याचा आहे, अशी घणाघाती टीका पटोले यांनी केली.
लाडक्या बहिणीची मते फक्त विधानसभा निवडणुकीसाठी हवी होती म्हणूनच योजनेचा लाभ दिला. आता भाजप युती सरकारला लाडकी बहिण योजनेतील त्रुटी दिसत आहेत. पैसे परत घेण्याची धमकी मंत्रीच देत आहेत. यातून भाजप युतीचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याचेही नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.