
Eknath Shinde News: महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शिंदे यांनी महायुतीच्या विजयाची दोन महत्वाची कारणे सांगितली आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीच्या विजयात दोन गोष्टींचा महत्त्वाचा वाटा आहे. एक म्हणजे कल्याणकारी योजना आणि दुसरी म्हणजे आम्ही केलेलं विकासकामं.
शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीने थांबवलेली विकासकामं आम्ही पूर्ण केली. तर दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या. विकासकामं आणि कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घातली. हा जनतेचा विजय आहे.महायुतीच्या सर्वांनी निवडणुकीत प्रचंड काम केलं. मी तर प्रचाराच्या काळात अवघ्या दोन ते तीन तास झोप घेत होतो.
महायुतीने राबवलेली माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, मला कुठलाही पदापेक्षा सख्या भाऊ हे पद मोठे वाटते. विरोधक आपला पराभव ईव्हीएममुळे झाल्याचे सांगत आहेत.मात्र, जेव्हा ते विजयी होतात तेव्हा त्यांना ईव्हीएमची आठवण येत नाही. लोकसभेत ईव्हीएममध्ये नव्हते का? असा टोला देखील शिंदेंनी लगावला.
एकनाथ शिंदे यांनी भाजपचे पक्षश्रेष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपच्या नेत्याला शिंदेंचा पाठींबा असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.