Ambadas Danve In Nagpur : गुत्तेदारांच्या फायद्यासाठी विकासाच्या नावाखाली नागपूरकरांची वाट लावली...

Vidarbha News :अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना पुराला सामोरे जावं लागत असेल तर हे दुर्दैव.
Ambadas Danve In Nagpur News
Ambadas Danve In Nagpur NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : दोन दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या दोन तासांच्या पावसाने दाणादाण उडाली होती. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊन लोकांना होडीतून सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ आली होती. (Ambadas Danve( नागपुरात पुराचे असे थैमान सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी नागपुरात पावसामुळे नुकसान झालेल्या घराची आणि भागाची पाहणी केली तेव्हा त्यांना लोकांच्या रोषालाही समोर जावे लागले होते.

Ambadas Danve In Nagpur News
Sharad Pawar in Killari : भूकंपानंतर मदतीचा हात देणाऱ्या शरद पवारांबद्दल किल्लारीकर व्यक्त करणार कृतज्ञता...

आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Nagpur) नागपुरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत नागरिकांच्या भेटीही घेतल्या. त्यानंतर त्यांनी भाजप (BJP) व नागपूरच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग घेऊन नागपूरच सिमेंटीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आला.

नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलून देण्याचे पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केले, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. (Maharashtra) या घटनेला नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हेही तितकेच जबाबदार असून, यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आल्याचे दानवे यांनी म्हणत प्रशासन यंत्रणेच्या कारभारावरही बोट ठेवले.

प्रशासनाची यंत्रणा घटना घडण्याची वाट बघत होते का? अशी स्थिती आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी तातडीने नागरिकांपर्यंत मदत पोहाेचणे आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मात्र, या भिंतीचे काम हे चार टप्प्यांत होणार होत. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले गेले, असा आरोपही दानवे यांनी केला.

सध्या पुरामुळे पहिल्या टप्प्याचे काम नव्याने करावे लागेल अशी स्थिती आहे. या संरक्षक भिंतीचे चारही टप्प्यांच्या कामाचा नव्याने डीपीआर बनवून काम लवकर हाती घ्यावं, या कामात आमचं सहकार्य राहील, अशी ग्वाही दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. प्रशासकीय यंत्रणेवर नसलेले नियंत्रण, अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना पुराला सामोरे जावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे, अशी टीकाही दानवे यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com