Raosaheb Danve News: जे.पी. नड्डांच्या वक्तव्यानंतर दानवेंचं 'आरएसएस' संदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले...

Raosaheb Danve On RSS : दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी 'आरएसएस' संदर्भात (RSS) केलेल्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

Raosaheb Danve On RSS: दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी 'आरएसएस' संदर्भात (RSS) केलेल्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नड्डांच्या या वक्तव्याचा अर्थ आता त्यांना आरएसएसची गरज नाही, असाच होतो अशी टीका विरोधकांनी भाजपवर करायला सुरुवात केली आहे. या टीकेनंतर भाजपने सारवासारव केली. अशातच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीदेखील भाजप आणि आरएसएस (BJP And RSS) मध्ये काहीही भेद नसल्याचं म्हटलं आहे.

जे. पी. नड्डा (J P Nadda) म्हणाले होते, सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची (RSS) गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजप स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते. आमच्या पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत, असं वक्तव्य नड्डा यांनी केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नड्डांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. अशातच आता रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाजप आणि आरएसएस वेगळं नसल्याचं म्हटलं आहे. दानवे म्हणाले, आरएसएस आणि भाजप कधीही वेगळे होऊ शकत नाहीत. आरएसएस आमची मातृ संस्था असून आम्हाला राजकारणात आम्हाला सल्ला देतील. परंतु, इंटर फेअर करतील असे मुळीच नाही, असं दानवे म्हणाले. यावेळी दानवे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात भाष्य केलं.

Raosaheb Danve
Bharat Sevashram Sangh : ममतांनी प्रचारात काढला BSS चा मुद्दा; पंतप्रधान मोदी म्हणाले, धमकी दिली...

दानवे म्हणाले, देशात लोकशाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. देशातील मतदार हुशार आहे. त्यामुळे ते विधानसभेला उभे राहिले तर त्यावेळेस लोक कोणाला पाठिंबा द्यायचं ते ठरवतील. तसेच जरांगे यांनी कोणाला पाडायचं हे सांगितलं नव्हतं, त्यांनी फडणवीसांवर टीका केली त्यामागे अंतरवालीतील लाठीहल्ला हे कारण होतं. लाठीहल्ला गृहविभागाने केल्याचा राग जरांगेंना असेल. मात्र जरांगेंचा परिणाम कुठेही नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील यात शंका नाही. तर राज्यात महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com