भास्कर जाधवांना स्वत:च्या मतदारसंघातील अंधार दिसत नाही का; चित्रा वाघांनी डिवचलं

Chitra wagh| Bhaskar jadhav| चित्रा वाघ यांनी आज रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेल्या मिर्ले गावात गेल्या होत्या.
Chitra wagh|
Chitra wagh|

रत्नागिरी : भाजपच्या (BJP) महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना भास्कर जाधव यांच्या मतदार संघातच पक्के रस्ते नसल्याचे सांगत वाघ यांनी त्यांना मतदार संघातील अंधार दिसत नाही का असा सवाल उपस्थित करत त्यांनी जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh Latest news Update)

चित्रा वाघ या भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील खेड तालुक्यात असलेल्या मिर्ले गावात गेल्या होत्या. मिर्ले गावात शिवसेनेची सत्ता आहे. तर खासदार राष्ट्रवादीचे आहेत. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही मिर्ले धनगरवाडी रस्त्याची अशी अवस्था? असा सवाल वाघ यांनी केला आहे.

Chitra wagh|
हनुमान जन्मस्थळाचा वाद, पण साधू महंतच आपापसात भिडले

भास्कर जाधव गुहागर मतदारसंघाचे आमदार आहेत. पण त्यांच्या याच मतदार संघातील खेड तालुक्यातील मिर्ले गावच्या धनगरवाडीकडे जाणारा साधा रस्ताही नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमचाच मुलगा आहे, शिवसेनेचे आमदार तुम्हीच आहात. जिल्हा परिषद त्यांच्याकडेच आहे. पण तरीही या गावातील छोटी लेकरं, आया, वृद्ध आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. शाळेत जाण्यासाठी गावातील मुले रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशी दुर्देवी अवस्था आहे, असं म्हणत वाघ यांनी डिवचंल आहे.

या गावातील लहान मुलांना शाळेत जायचं पण गावातील झोलाईदेवी ते धनगरवाडी रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही. शाळेत जायचं म्हटलंं तर वाटेत विंचू, सापासारखे प्राणी असतात. गावातील वृद्ध, गर्भवती महिलांनाही याचा त्रास होतो. त्यामुळे मुंबईत येऊन तोंडाची वाफ घालवत भाजप विरोधात जोर लावण्यापेक्षा तुमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी लावा. गावतल्या लहान मुलांना पावसाळ्यात सुरक्षितपणे शाळेत जाता येईल, याची व्यवस्था करावी, असा सल्ला वाघ यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे.

याच वेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही आदिवासी धनगरवाड्या -वस्त्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. आदित्य ठाकरेंनी भास्कर जाधव त्यांच्या मतदारसंघातील धनगरवाडीतील रस्त्यांच्या कामांकडे लक्ष द्यावे. भयग्रस्त भागांतून डोंगर दऱ्यातून वाट काढत शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना सुरक्षितपणे जाता येईल हे पहावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

तसेच, काळजी करू नका आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा करुन तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन वाघ यांनी ग्रामस्थांना दिले आहे. आमचे धोंडू गोरे, अनिकेत कानडे गावातील रस्त्यांसाठी पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com