Nitesh Rane vs Aditya Thackeray : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...

Sindhudurga submarine project : ...हे सगळं आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
Nitesh Rane and Aditya Thackeray
Nitesh Rane and Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sindhudurga News : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याच्या चर्चा गेले दोन दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या प्रकल्पावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा प्रकल्प होणार आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी जनतेला दिला आहे.

नितेश राणे म्हणाले, 'सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलट सुलट बातम्या येत आहेत. कोणतीही खात्रीशीर माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी, आमच्या महायुती सरकारवर विरोधक टीका करण्याचे काम करत आहेत. हा पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हयातच होणार आणि आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपास येईल.' तसेच, 'आदित्य ठाकरे यांनी कोणतीही चालना येथील पर्यटनाला दिली नाही.' असाही आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर '2018च्या जवळपास जेव्हा मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) हे अर्थ राज्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोणतीही चालना येथील पर्यटनाला दिली नाही. प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला. त्यामुळे या प्रकल्पाचे येथील काम जैसे थेच राहिले. गुजरात आणि केरळ मध्येही कामं सुरू झाली. हे सगळं आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे.' असा घणाघात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर(Aditya Thackeray) केला आहे.

तसेच 'आमचं महायुतीचं सरकार हा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल.' असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

याशिवाय 'जसा पाणबुडीच्या प्रकल्प सिंधुदुर्गात आला तसाच प्रकल्प गुजरातने करायचा निर्णय घेतला आहे. तसेच गुजरातप्रमाणे केरळमध्ये देखील असा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे कोणीही आपला प्रकल्प पळवला असे म्हणता येणार नाही, असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

महायुतीचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करेल व हा देशातला आदर्श प्रकल्प असेल, असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पावरून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com