
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
नितेश राणे यांनी आंदोलनाचे श्रेय मनोज जरांगे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
राणे यांनी मराठा समाजातील प्रत्येक नागरिकाला देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्याचे आवाहन केले.
Ratnagiri News : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास यश आले आहे. त्यांनी विजयाचा गुलाल उघळत 8 पैकी 6 प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. तर हैद्राबाद गॅझेट संदर्भात महत्वाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैर संपले अशी घोषणा केलीय. यानंतर आता भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी मनोज जरांगेंवर पहिली प्रतिक्रिया देताना निशाना साधला आहे. त्यांनी, जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच त्यामुळे आता त्यांचे आभार मानावे तेवढेच कमीच आहेत. मराठा समाजातील प्रत्येक नागरीकांने त्यांचे आभार मानावेत असेही त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर ते सुरू करेपर्यंत देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर त्यांच्या आईबाबतही अपशब्द वापरल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी जरांगेंवर निशाणा साधताना टी करत इशारा दिला होता. त्यांनी, जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई-बहिणींचा आदर केला. जरांगे यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी. मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द वापरू नयेत. तशी हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे. हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, असे म्हटले होते. ज्याला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी नितेश राणेंचा उल्लेख चिचुंद्री असा केला होता. यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता होती.
यादरम्यान आता जरांगे यांचे आंदोलन संपले असून त्यांच्या 8 पैकी 6 प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेटियरही तातडीनं लागू करण्यात आले आहे. त्याबाबत शासन निर्णयही काढण्यात आला आहे. तर सातारा आणि औंध गॅझेटिरमधल्या त्रुटी दूर करत करण्यासाठी सरकारने 15 दिवसांचा अवधी मागितला असताना जरांगे यांनी एक महिन्याचा अवधी दिला आहे. ज्याचा जीआरही काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं. तसेच मराठा आणि कुणबी एकच आहेत या मागणीचा जीआर काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीनं मागण्यात आलं आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला यश आल्याचे बोलले जात आहे.
अशातच आता निलेश राणे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जुनी होती. मराठवाड्यात कुणबी नोंदी असून आरक्षण द्यावं, हैदराबादगॅझेट प्रमाणे ते मिळावं अशी मागणी होती. त्याबाबत आता आमच्या सरकारने निर्णय घेतला असून जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो फक्त फडणवीस यांच्या कालावधीमध्येच. यामुळे मराठा समाजाने याची दखल घेऊन मराठा समाजातील प्रत्येक नागरीकांने त्यांचे आभार मानले पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.
फडणवीसांना टार्गेट केलं, पण...
मराठा समाजाचे. जरांगे यांनी सतत फडणवीसांना टार्गेट केलं, पण... त्यांनीच तुम्हाला न्याय दिला. मराठा समाजाला राणे समितीच्या अनुषंगाने जर कोणी आरक्षण दिलं तर ते फडणवीस सरकारने दिले आहे. मात्र यावेळीही ओबीसी समाजाला न दुखवता या आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यात आला आहे. जातीच्या नावावर हिंदू समाजाला तोडण्याचे प्रयत्न केला जात होता. मात्र तो फडणवीसांनी हाणून पाडला. त्यामुळे फडणवीसांचे आभार मानावे तेवढे थोडेच असल्याचेही नितेश राणे म्हणाले.
प्रश्न: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता? उत्तर: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हा होता.
प्रश्न: नितेश राणे यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत कोणाचे आभार मानले? उत्तर: नितेश राणे यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
प्रश्न: नितेश राणे यांनी मराठा समाजातील लोकांना काय आवाहन केले आहे? उत्तर: नितेश राणे यांनी मराठा समाजातील प्रत्येक नागरिकाला देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्याचे आवाहन केले आहे.
प्रश्न: देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणात काय योगदान आहे, असे नितेश राणे यांना वाटते? उत्तर: नितेश राणे यांच्या मते, मराठा समाजाला जेव्हा जेव्हा गुलाल उधळण्याची संधी मिळाली, तेव्हा ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाले.
प्रश्न: या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांची कोणती प्रतिक्रिया आली आहे का? उत्तर: प्रस्तुत माहितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेचा उल्लेख नाही. ही प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.