CM Pramod Sawant: महायुतीत उमेदवारीवरून वादाची ठिणगी? मुख्यमंत्री म्हणाले,'नो कॉम्प्रोमाइज'

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार हे निश्चित आहे, असा प्रबळ दावा सावंत यांनी केला आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha

लोकसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावरच महायुतीमध्ये कोकणातील जागांवरून रणकंदन सुरू आहे. महायुतीमधील नेते परस्परविरोधी विधान करीत आहेत. अशातच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात(Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency 2024) कमळ फुलवायचं आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. कोणी पण कुठलेही तिकीट मागून द्या. ही जागा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळासाठीच असल्याचे मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. ते रत्नागिरी दौऱ्यावर असताना बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर माजी माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळ माने,राजन तेली आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवरून महायुतीमधील शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'देअर इज नो कॉम्प्रोमाइज'

ज्यावेळेला खुद्द एक मुख्यमंत्री तुमच्याकडे येतोय त्या वेळेला तुमच्या लक्षात यायला पाहिजे की, 'देअर इज नो कॉम्प्रोमाइज' कारण मी येताना देवेंद्रजींकडे बोलून आलोय कारण कोकणावर आणखी अन्याय होणार नाही, खूप झाले आता आम्ही खूप बघितलं आजवर कोणामुळे अन्याय झाला हे तुम्हाला माहीत आहे; पण आता आपल्याला भारतीय जनता पार्टीवर पण आणि आपल्या कोकणातल्या जनतेवर पण अन्याय होणार नाही, आता मोदींजी आहेत," असा आक्रमक पवित्रा प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. या वेळेला निश्चितच विश्वास ठेवा की हा मतदारसंघ आपण कमळाच्या चिन्हावरच लढणार आपण आणि आपला कार्यकर्ता या वेळी कमळावरच निवडून लोकसभेत जाणार हे निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे, कमळ फुलणार हे निश्चित आहे, असा प्रबळ दावा सावंत यांनी केला आहे.

CM Pramod Sawant
Sambhaji Bhide News: संभाजी भिडे यांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला; रायगडावर 'रोप वे' ने जाणे...

फिर एक बार मोदी सरकार...

यही समय है...सही समय है...अबकी बार चारसाै पार...फिर एक बार मोदी सरकार... अशा घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करत लोकसभेत 370 जागा आपल्याला भाजपच्या निवडून आणायचे आहेत आणि या 370 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून, येथे कमळ फुलवायचे आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे कोणीही कोणतेही तिकीट मागू द्यात ही तिकीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळाचच असं ठामपणे सांगत मुख्यमंत्री सावंत यांनी रत्नागिरी येथे बोलताना अप्रत्यक्षरीत्या या लोकसभेवर दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुनावले.

मोदी सरकारने गेली दहा वर्षांत देशातील प्रत्येक घटकासाठी असंख्य योजना आणल्या आहेत. आता साठ दिवसांत मोठं काम करावे लागणार आहे. विकसित भारतासाठी मोदींसाठी लोक मत द्यायला तयार आहेत, असे सांगत त्यांनी या वेळी काँग्रेसचा समाचार घेत कोणतेही नेतृत्व नसलेली पूर्वीची यूपीआय हीच आताचे नाव बदललेली काँग्रेसची इंडिया आघाडी आहे, अशा शब्दांत समाचार घेतला. अजून कोणीही असतील उबाठा असेल सुबाठा असेल अजून असे कोण कोण असतील असं सांगत ठाकरे गटावरही त्यांनी टीका केली. पण एक लक्षात घ्या या वेळेचे मतदान हे विकसित भारतासाठी आहे. मोदी सरकारने आजवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक योजना आणल्या स्टार्ट अप इंडिया, पीएम विश्वकर्मा, घरकुल योजना, हर घर नल पाणी योजना, मुद्रा योजना अशा अनेक योजना मोदी सरकारने आणल्या. शेतकरी, मच्छीमार, युवक, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदी सरकारने योजना आणल्या.

अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्त्वांवरती भारतीय जनता पार्टीचे सरकार काम करतं असून, अंत्योदय हे मूळ तत्त्व आहे, ज्याच्यापर्यंत कोणीही पोहोचत नाही, त्याच्यापर्यंत मोदीजींच्या सरकारच्या योजना भाजपचा कार्यकर्ता पोहाेचवत आहे. निश्चितपणे इतकं चांगलं वातावरण झालं आहे. हेच वातावरण आपल्याला मतदानामध्ये परावर्तित करायचं आहे, असे आवाहन करत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं काम मोदी सरकारने केल्याचे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

2004 ते 2014 या काँग्रेसच्या काळात देशासाठी एकही योजना आली नाही. मनमोहनसिंग सरकारने केलेली एक तरी योजना सांगा हे माझं खुले आव्हान आहे. हेच काँग्रेसचे नेते होते. त्यांनी केलेल्या चुकीच्या धोरणामुळे देश भारत डबघाईस गेला. काँग्रेसच्या काळात अनेक स्कॅम उघडकीस आले हे नवमतदाराला सांगा त्यालाही माहिती नाही, त्याच्यापर्यंत हे पोहोचवा, असेही आवाहन त्यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com