Sambhaji Bhide News: संभाजी भिडे यांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला; रायगडावर 'रोप वे' ने जाणे...

Sambhaji Bhide Attacked Sharad Pawar Over Raigad visit:"नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जन्मले असते तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र देशात शिकवले असते.दहा वर्षात देशाचा चेहरा संपूर्ण जगात वेगळा करून दाखविला असता,"
Sambhaji Bhide Attacked Sharad Pawar
Sambhaji Bhide Attacked Sharad PawarSarkarnama

Jalgaon: 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर 'रोप वें' ने जाणे चुकीचे आहे,' असे मत संभाजी भिडे (Sambhaji Bhide Attacked Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नुकतेच डोली करून रायगडावर (Raigad) एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावर पवारांचे नाव न घेता भिडे यांनी त्यांना टोला लगावला.

शिवराय हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे आज जळगाव येथे आले. लेवा भवन येथे आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच मराठ्यांचा इतिहास हा वाचून त्याचे स्मरण केलेच पाहिजे, त्यांचे जर विस्मरण झाले तर या देशाला पुन्हा पारतंत्र्याचां धोका आहे. शरद पवार यांनी नुकताच रायगडवर डोली ने जावून एका कार्यक्रमात भाग घेतला याचा उल्लेख न करता व नाव न घेता त्यांनी रायगडवर रोप वे ने जाणे अयोग्य आहे, असे मत व्यक्त केले. 'मुळात रायगडावर रोप वे करणारी व्यक्तीचं खऱ्या अर्थाने देशद्रोही आहे,' असा आरोपही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना संभाजी भिडे म्हणाले, "नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जन्मले असते तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र देशात शिकवले असते.दहा वर्षात देशाचा चेहरा संपूर्ण जगात वेगळा करून दाखविला असता,"

Sambhaji Bhide Attacked Sharad Pawar
Bharat Jodo Nyay Yatra : मोठी बातमी ! मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची तोफ धडाडणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या नव्या पक्षाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ असं नाव दिले आहे. नुकतंच या पक्षाला 'तुतारी’ चिन्ह मिळालं आहे. तुतारी हे चिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी ‘वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी’ नाराही दिला. तसेच तुतारी या नव्या चिन्हाचं अनावरण रायगडावर एका सोहळ्यात नुकतेच करण्यात आले. या सोहळ्यासाठी शरद पवार पालखीतून रायगडावर गेल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी पवारांना खोचक टोला लगावला.

पक्षचिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार हे तब्बल ४० वर्षांनी रायगड किल्ल्यावर आले. आधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आले. रायगडावर शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण करण्यात आले. "सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. देशामध्ये गंभीर स्थिती आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटाने जवळपास अशक्य करून ठेवलं आहे, असे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com