Kokan News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून काही दिवसांपूर्वीच गच्छंती करण्यात आली होती. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईक यांना पदावरून हटवले होते. यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. आता नाईक यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिले आहे.
वैभव नाईक एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, "आठ महिन्यापूर्वी सत्ता परिवर्तन झालं. आमच्याच लोकांना आमिषं देऊन फोडण्यात आलं. मलासुद्धा आमिषं दाखवण्यात आली. माझ्यावर प्रचंड दबाव होता. मात्र आपला सर्वांचा चेहरा आठवला. आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांनी माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता, पैशाचं आमिष न घेता, मला निवडून दिलंय. त्या सर्वसामान्य जनतेसाठी मला आपल्यासोबत राहिलं पाहिजे, असं वाटलं. अन् तीच भूमिका या पुढच्या काळामध्ये ठेवीन, असे नाईक म्हणाले.
यामुळे नाईक यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाले नाही. वैभव नाईक हे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे, स्पष्ट केले आहे. पक्षाने त्यांना पक्षाची मोठी जबाबदारी दिल्यानेच, त्यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडले होते, असे ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.