Lok Sabha Election : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या आधी चारशे पारचा नारा दिला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यापर्यंत भाजप चारशे पार नाही 200 पार देखील होणार नसल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तर, राजकीय अभ्यासक देखील भाजपला 250 च्या आसपास जागा मिळतील, असे सांगत आहेत.मात्र, भाजप चारशे पार करणारच असा ठाम विश्वास भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त करत 400 चा आकडा कसा गाठणार याचा प्लॅन एका मुलाखतीमध्ये सांगितला.
' भाजप BJP 340 ते 355 जागा जिंकेल. देशभरातली 160 जागा असा आहेत तेथे भाजप कधीच जिंकलेला नाही. त्या जागांपैकी 60 ते 65 जागा भाजप जिंकेल. भाजपचे मित्र पक्ष गेल्या निवडणुकीत 77 जागांवर जिंकले होते. तेवढ्या जागा ते परत मित्रपक्ष जिंकत आहेत. त्यामुळे भाजप आरामशीर चारसो पार होत आहे', असे विनोद तावडे Vinod Tawde म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पूनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून गद्दारांच्या मुलाला उमेदवारी मिळते मात्र भाजपसाठी आयुष्य घालवणाऱ्या प्रमोद महाजनांच्या मुलीला उमेदवारी मिळत नसल्याची टीका केली होती. पूनम महाजनांना उमेदवारी मिळली नसली तरी पूनम महाजन यांच्या भवितव्यासाठी पक्षाने वेगळा निर्णय केला असावा', असे म्हणत विनोद तावडे यांनी भाजपची बाजु सावरली.
भाजपकडून चारसो पारची घोषणा देण्यात येत असली तरी उद्धव ठाकरे आपल्या जाहीर सभेतून भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवत आहेत. चारसो पार नव्हे तर भाजप तडीपार होणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे हे करत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.