राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियमांतर्गत परवानगी दिली आहे. आता राज्य सरकारने या बाइक टॅक्सीचे भाडेदर निश्चित केलं आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अमरावतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ता लावलेल्या फलकावरुन शिवसेनेच्या उपनेत्या प्रिती बंड यांचा फोटो नसल्याचे वादाला तोंड फुटलं आहे. प्रीती बंड यांनी काही महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्ञानेश्वर धाने पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यांची ही भेट नेमकी कशासाठी आहे हे माहिती नसलं तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आंदोलनाची तयारी सुरू केली असतानाच आता महात्मा फुले समता परिषदेने देखील मेळावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. महात्मा फुले समता परिषद, विविध ओबीसी संघटना आणि बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला असून याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग, रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी ओबीसींनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे आणि विशाल हजारे यांनी केलं आहे.
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सचेत अँपने वर्तवली आहे. यासाटी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आल्यानंतर एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे नातू होते.
मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. या दोन दिवसात 15 हून जास्त महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून या पावसाचा सर्वाधिक फटका आष्टी शिरूर कासार अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यांना बसला आहे. या ठिकाणच्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी नागरिकांना वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले होते. तर दुसरीकडेमाजलगाव आणि मांजरा धरणातून अद्यापही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आज बीड जिल्ह्यातील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बहुचर्चित नवी मुंबई येथील विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहुर्त अखेर ठरला आहे. सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबरला होणार असल्याचं सांगितलं आहे. हे देशातलील सर्वात मोठे विमानतळ आहे. तर येथील ऑपरेशन नोव्हेंबर महिन्यात नियमित सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.